शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सरकारकडून केवळ आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:31 IST

भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : उपरी येथे काँग्रेसचा शेतकरी, शेतमजूर मेळावा

ऑनलाईन लोकमतसावली: भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, माजी उपसभापती राकेश गड्डमवार, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार, विजय मुत्यालवार, पं.स. सदस्य विजय कोरेवार, भाष्कर गड्डमवार, विलास भांडेकर, शंकर बोदलकर, जि.प. सदस्य वैशाली शेरकी, सरपंच शिला म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.आ. वडेट्टीवार म्हणाले, भाजप सरकारने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या १३०० शाळा बंद करून गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीच्या नावावर अनेक जाचक अटी लावून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी दिली नाही.जनतेच्या पैशाची केवळ उधळपट्टी केली जात आहे. कोरगाव भीमा येथे जातीय दंगली घडविणाऱ्या संभाजी भिडे व विनायक एकबोटे यांना अटक करण्याचे सोडून संरक्षण देण्याचे काम करीत आहे.जातीय तेढ निर्माण करणारे व शेतकरी, शेतमजूरविरोधी सरकार असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जागा दाखवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमंतावर मेहरबान आणि गरीबांवर अन्याय हेच सुरू असल्याची टीका त्यांनी मेळाव्यात केली. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आणून बारमाही सिंचनाची व्यवस्था केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी ३५० कोटींची निविदा मंजूर करण्याचे काम येत्या काही दिवसात होणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी नमूद केले. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही विचार मांडले.उपरी येथील सरपंच तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आशिष मनबत्तुनवार आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले.संचालन प्रविण गेडाम यांनी केले.आभार यशवंत बोरकुटे यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.