शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सरकारकडून केवळ आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:31 IST

भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : उपरी येथे काँग्रेसचा शेतकरी, शेतमजूर मेळावा

ऑनलाईन लोकमतसावली: भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, माजी उपसभापती राकेश गड्डमवार, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार, विजय मुत्यालवार, पं.स. सदस्य विजय कोरेवार, भाष्कर गड्डमवार, विलास भांडेकर, शंकर बोदलकर, जि.प. सदस्य वैशाली शेरकी, सरपंच शिला म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.आ. वडेट्टीवार म्हणाले, भाजप सरकारने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या १३०० शाळा बंद करून गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीच्या नावावर अनेक जाचक अटी लावून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी दिली नाही.जनतेच्या पैशाची केवळ उधळपट्टी केली जात आहे. कोरगाव भीमा येथे जातीय दंगली घडविणाऱ्या संभाजी भिडे व विनायक एकबोटे यांना अटक करण्याचे सोडून संरक्षण देण्याचे काम करीत आहे.जातीय तेढ निर्माण करणारे व शेतकरी, शेतमजूरविरोधी सरकार असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जागा दाखवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमंतावर मेहरबान आणि गरीबांवर अन्याय हेच सुरू असल्याची टीका त्यांनी मेळाव्यात केली. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आणून बारमाही सिंचनाची व्यवस्था केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी ३५० कोटींची निविदा मंजूर करण्याचे काम येत्या काही दिवसात होणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी नमूद केले. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही विचार मांडले.उपरी येथील सरपंच तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आशिष मनबत्तुनवार आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले.संचालन प्रविण गेडाम यांनी केले.आभार यशवंत बोरकुटे यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.