शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थी विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगातल्या सर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण. अनेक समस्यांच्या निराकरणाचा हा रामबाण उपाय आहे. गेली ५ वर्षे जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी मंत्री म्हणून मी प्रयत्नांची शर्थ केली. यापुढे आमदार म्हणून विधीमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थी विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुद्धलवार, पंचायत समितीचे उपसभापती सोमेश्वर पद्मगिरीवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, माजी सभापती गोविंद पोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, कोर्टीमक्ताचे सरपंच गोविंद उपरे उपस्थित होते. आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सांघिक भावना या माध्यमातुन विकसित होते. जिल्ह्यातील अनेक समस्यांची सोडवणूक गेल्या ५ वर्षात मंत्री म्हणून करू शकलो याचा मला आनंद आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन या दोन दिवशी आपण भारत माता की जय म्हणतो. मात्र उर्वरित ३६५ दिवस हिच कृती सातत्याने करण्याची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहावे, आदर्श विद्यार्थी जिल्ह्यात घडावे यादृष्टीने मिशन शक्ती, मिशन सेवा असे अनेक उपक्रम गेल्या ५ वर्षांत आम्ही राबविले. यापुढील काळातही ही प्रक्रिया अधिक सक्षम व सदृढ व्हावी यावर आपला भर राहील, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जि. प. सदस्य संध्या गुरनुले व अन्य मान्यवरांची भाषणे झालीत. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार