शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

२९ हजार ७६२ मजुरांनाच मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ कलम १२ (ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश होता. सदर योजनांना शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य मिळत होते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील मनरेगाची स्थिती : ८५५ ग्रामपंचायतींमध्ये ४९९ कामे सुरू

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कामे अंतिम टप्प्यात असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील मजुरांना रोजगाराची चिंता भेडसावत आहेत. त्यामुळे जॉबकार्डधारक मजुरांच्या नजरा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांकडे लागल्या. सद्य:स्थितीत ८५५ ग्रामपंचायतींध्ये ४९९ कामे सुरू असून त्यावर केवळ २९ हजार ७६२ मजुरांच्याच हाताला काम मिळाले आहे.महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ कलम १२ (ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश होता. सदर योजनांना शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य मिळत होते. सन २००५ रोजी केंद्र्र शासनाने रोजगार हमी कायदा तयार करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे नामांतरण केले. या योजनेतंर्गत प्रौढ व्यक्तीला अकुशल रोजगाराचा हक्क आहे. त्यासाठी कुटुंबनिहाय जॉबकार्ड तयार केले जाते. नोंदणीकृत कुटुंबाला वर्षभर १०० दिवस प्रती कुटुंब केंद्रीय निधीतून व आश्यकतेनुसार जादा दिवसांसाठी राज्य निधीतून कामाची हमी देण्याची कायद्यात तरतूद आहे.ग्रामपंचायतींनी झटकावा आळसमनरेगाची कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींची आळस झटकून प्रशासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. कुटुंब नोंदणी करणे, ग्रामसभेतून रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज घेणे, नियोजन आराखडा व कामाचे प्राधान्य ठरविणे, सामाजिक अंकेषण व पारदर्शकतेकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.२ हजार ४९ मजुरांना प्रतीक्षा१५ तालुक्यात २ हजार ४९ मजुरांनी बँकेचे पासबूक व आधारक्रमांक अद्याप दिले नाही. त्यामुळे रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मनरेगाच्या कामात सामावून घेण्यात येणार आहे.मजुरांसाठी सवलतीगावापासून ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर रोजगार दिल्यास १० टक्के जास्त मजुरी द्यावी लागते. अकुशल रोजगार उपलब्ध न केल्यास दैनिक मजुरीच्या २५ टक्के बेरोजगार भत्ता, पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार व ६ वर्षांखालील मुलांना सांभाळण्याची सोय, रूग्णसेवा, अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास ५० हजार सानुग्रह अनुदान देण्याची जबाबदारी पंचायत समिती व जिल्हा परिषदेची आहे.सात तालुक्यात मनरेगाची अत्यल्प कामे८५५ ग्रामपंचायतींमध्ये ४९९ कामे सुरू आहेत. सर्वाधिक कामे ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड, मूल, सावली, वरोरा व सिंदेवाही ब्लॉकमध्ये मंजूर झाली. १५ ब्लॉकमध्ये २९ हजार ७६२ मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र बल्लारपूर, पोंभुर्णा, कोरपना, राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, जिवती तालुक्यात अत्यल्प कामे सुरू आहेत. शेतीची कामे संपताच शेकडो मजुरांवर अन्यत्र स्थलांतरण करण्याची वेळ येऊ शकते.