शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जिल्ह्यात केवळ २६ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:06 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली. एकून लागवड क्षेत्राच्या २६ टक्के पेरणा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.खरीप हंगामासाठी ४ लाख ३५ हजार ५२२ हेक्टर कृषी विभागाने नियोजन केले होते. त्यामध्ये भात १ लाख ८० हजार १९६ हेक्टर, सोयाबिन ४९, ७५० तर कपाशी १ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर लागवड होणे शिल्लक आहे. त्यापैकी कपाशीची लागवड ७७ हजार ४६५ हेक्टरवर करण्यात आली. सोयाबिन पिकांची लागवड ८ टक्के झाली. भात पिकांचे ४ हजार ^६८७ हेक्टर क्षेत्रावर पºहे टाकण्यात आले. ४ हजार ६९६ हेक्टर आवत्या भाताची पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी अवघी ४ टक्के आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र, यावेळी जून महिन्याचा पंधरवडा लोटला. तरी पावसाला सुरुवातच झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यांनतर काही काही शेतकºयांनी धूळपेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करुन नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. दरम्यान मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन व कपाशीची लागवड जोरात सुरू आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने रोवण्यावर लांबणीवर जाणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती