शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात केवळ २६ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:06 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली. एकून लागवड क्षेत्राच्या २६ टक्के पेरणा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.खरीप हंगामासाठी ४ लाख ३५ हजार ५२२ हेक्टर कृषी विभागाने नियोजन केले होते. त्यामध्ये भात १ लाख ८० हजार १९६ हेक्टर, सोयाबिन ४९, ७५० तर कपाशी १ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर लागवड होणे शिल्लक आहे. त्यापैकी कपाशीची लागवड ७७ हजार ४६५ हेक्टरवर करण्यात आली. सोयाबिन पिकांची लागवड ८ टक्के झाली. भात पिकांचे ४ हजार ^६८७ हेक्टर क्षेत्रावर पºहे टाकण्यात आले. ४ हजार ६९६ हेक्टर आवत्या भाताची पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी अवघी ४ टक्के आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र, यावेळी जून महिन्याचा पंधरवडा लोटला. तरी पावसाला सुरुवातच झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यांनतर काही काही शेतकºयांनी धूळपेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करुन नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. दरम्यान मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन व कपाशीची लागवड जोरात सुरू आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने रोवण्यावर लांबणीवर जाणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती