शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

फक्त २५ हजार डोस मिळाले बहुतांश केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

चंद्रपूर : मागील चार दिवसांपासून लस घेण्यासाठी केंद्रात येणाऱ्या नागरिकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. ...

चंद्रपूर : मागील चार दिवसांपासून लस घेण्यासाठी केंद्रात येणाऱ्या नागरिकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. मात्र, नागरिकांना आता मंगळवारी लस मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री उशिरा २५ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे बहुतांश केंद्रांवर अल्प प्रमाणात का होईना, लसीचे वितरण करण्याची तयारी जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ६० वर्षे, ४५ वर्षांवरील सहव्याधी आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ एप्रिलपासून जिल्ह्यात सुमारे २०० केंद्र सुरू करण्यात आली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका केंद्राचा अपवाद वगळल्यास सर्वच केंद्रांमधून कोविशिल्ड लस दिली जात आहे. हेल्थ केअर, फ्रन्टलाईन वर्करचे लसीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. ६० वर्षांवरील व सहव्याधींसह आता ४५ वर्षांवरील नागरिक दुसरा बुस्टर घेण्यासाठी लसीकरण केंद्रात सकाळी आठ वाजल्यापासूनच रांगा लावत आहेत. मात्र, लस नसल्याने तीन दिवसांपासून आरोग्य प्रशासनाने केंद्र बंद ठेवली आहेत. राज्य शासनाकडे एक लाखाहून जास्त डोस मागविण्यात आले होते. मात्र, २५ हजार डोस मंजूर झाले. सोमवारी रात्री उशिरा हे डोस नागपुरातून चंद्रपुरात आणण्यात येणार आहेत. राज्यांना लस उपलब्ध करून देण्यासोबतच केंद्रांची संख्या, अंतर, वयोगट आदींपासूनचे सर्वच अधिकार केंद्र सरकारने स्वत:कडे ठेवले आहेत. त्यामुळे राज्यांना पर्यायाने जिल्ह्यांनाही वेळोवेळी लसीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

वाढीव केंद्रांवर लागले ‘नो व्हॅक्सिन’ फलक

नागरिकांना लस घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्ह्यात व चंद्रपूर मनपा क्षेत्रात वाढीव केंद्र सज्ज ठेवण्यात आले. मात्र, मागणीनुसार लस मिळत नसल्याने दर आठवड्यात या केंद्राच्या प्रवेशद्वारावर लस नसल्याचा फलक लावावा लागत आहे. त्यामुळे लस मिळत नसेल तर वाढीव केंद्राचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.