शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात उरले शंभर वर्षांपूर्वीचे केवळ १० पिंपळवृक्ष

By admin | Updated: December 25, 2014 23:28 IST

हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात पवित्र मानली जाणारे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे चंद्रपुरातील १०० वर्षे पेक्षा जास्त वयाची पिंपळवृक्ष दुर्लक्षित पडली आहेत. पर्यावरण मित्रांनी शहरभर फिरून

प्रशासनानेही पुढाकार घ्यावा : पिंपळवृक्ष संवर्धनाची नितांत गरजचंद्रपूर : हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात पवित्र मानली जाणारे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे चंद्रपुरातील १०० वर्षे पेक्षा जास्त वयाची पिंपळवृक्ष दुर्लक्षित पडली आहेत. पर्यावरण मित्रांनी शहरभर फिरून या वृक्षांची पाहणी केली असता शंभर वर्षांपूर्वीची केवळ दहाच पिंपळवृक्ष शहरात शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यामुळे चंद्रपूरसारख्या प्रदूषित शहरात पिंपळवृक्षांचे जतन करणे गरजेचे झाले आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी शासन कोट्यवधींचा खर्च करीत आहे. तरीही वृक्षांचा झपाट्याने ऱ्हास होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. चंद्रपूर शहराला लागून अनेक उद्योग आहेत. त्यामुळे चंद्रपूरही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. त्या तुलनेत शहरात हिरवळ दिसत नाही. शंभर वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांचेही चंद्रपूरकर व येथील प्रशासन जतन करू शकले नाही. साधारणत: वडाचे वृक्ष सर्वाधिक काळ जगतात. त्यानंतर पिंपळाच्या वृक्षांचेही वयोमान अधिक आहे. येथील पर्यावरणमित्र तथा ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे व वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी चंद्रपूर शहरातील वयोवृद्ध पिंपळ वृक्षांची पाहणी केली असता शंभर व त्यापेक्षा अधिक वर्षांचे जुने पिंपळवृक्ष केवळ दहाच्या संख्येतच शिल्लक असल्याचे वास्तव पुढे आले. ही मोठी झाडे पर्यावरण व धार्मिक दृष्टया अतिशय महत्त्वाची असल्यामुळे त्यांचे जतन करणे गरजेचे झाले आहे.प्रा. चोपणे व सपकाळे यांनी शहरातील १०० ते २०० वर्ष वयाच्या पिंपळ वृक्षाच्या अस्तित्वाचा तपास करण्याची मोहीम हाती घेतली. यात सिव्हील लाईन परिसरात दोन, महाकाली परिसरात पाच, तुकूम परिसरात एक, बंगाली कॅम्प परिसरात एक, पठाणपुरा परिसरात एक अशी १०० ते २०० वर्षाचे मोठे दहाच वृक्ष शिल्लक असल्याचे दिसून आले. पिंपळाचे लहान वृक्ष शंभरच्या जवळपास आहेत. (शहर प्रतिनिधी)