शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबाऱ्यामुळे डोकेदुखी वाढली

By admin | Updated: November 17, 2016 01:51 IST

शासनस्तरावर शेतकऱ्यांना सोईचे व्हावे म्हणून या आधुनिक युगात आॅनलाईन सातबारा ताबडतोब मिळावा आणि त्याद्वारे कामे सोईस्कर व्हावी,

नागरी (रेल्वे): शासनस्तरावर शेतकऱ्यांना सोईचे व्हावे म्हणून या आधुनिक युगात आॅनलाईन सातबारा ताबडतोब मिळावा आणि त्याद्वारे कामे सोईस्कर व्हावी, या दृष्टीकोनातून शासनस्तरावर कितीतरी खर्च करण्यात आला. आणि जिल्हा पातळीवर आॅनलाईन प्रणाली पारदर्शकपणे व्हावी, असे निर्देश देण्यात आले. पण शासनस्तरावरील या आॅनलाईन पारदर्शकतेचा बट्याबोळ झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटन्सी यांच्या संयुक्त उपक्रमातून महाआॅनलाईन मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या महा- ई सेवा केंद्रातून शासनाने महसूल विभागातील विविध सेवांचा समावेश केलेला आहे. गावातील नागरिकांना कमी वेळेत सेवा चांगल्याप्रकारे मिळावी हा शासनाचा मानस आहे. परंतु वास्तविक सद्यस्थिती वेगळी आहे. आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्रात गेल्यानंतर त्यावर वेगळीच माहिती दिसत आहे. आजच्या परिस्थितीत सातबाऱ्यावर असलेली नोंद ही सन २०१३ पर्यंत अद्यावत असलेली आहे. यामध्ये शेतकऱ्याची भोगवटा नोंद, फेराफर नोंद, पीक पेरा नोंद, बँक बोझा या संबंधाने कुठल्याही प्रकारची अद्यावत माहिती नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय कामकाजामध्ये काम करताना अडचणी निर्माण होत आहे.सद्यस्थितीत शासनस्तरावर डिजीटलायझेशनचे काम चालु आहे. शासनाच्या महाभुमिलेख या आज्ञावलीमध्ये आॅनलाईन सातबारा नोंदणी संबंधाने शासनाने तहसील कार्यालयाला नोंदणी कक्ष चालु केले. परंतु शासनाने नोंदणी करताना तलाठी आॅफीसमधून मिळणारा हस्तलिखीत सातबारा देणेसुद्धा बंद केले. त्यामुळे शेतकऱ्यांना हस्तलिखीत सातबारा मिळण्यापासूनच वंचित रहावे लागत आहे. एकीकडे आॅनलाईनचा गाजावाजा असताना त्यामध्ये त्रुटी तर दुसरीकडे हस्तलिखीत सातबारा मिळण्यापासून शेतकरी वंचित आहेत. या शासकीय कामकाजात शेतकरीच होरपळला जात आहे. त्यामुळे शासनस्तरावर हा प्रश्न केव्हा निकाली निघणार, यामुळे शेतकरी कमालीचा चिंतेत पडला आहे. (वार्ताहर)