शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

आॅनलाईन सातबाऱ्यामुळे डोकेदुखी वाढली

By admin | Updated: November 17, 2016 01:51 IST

शासनस्तरावर शेतकऱ्यांना सोईचे व्हावे म्हणून या आधुनिक युगात आॅनलाईन सातबारा ताबडतोब मिळावा आणि त्याद्वारे कामे सोईस्कर व्हावी,

नागरी (रेल्वे): शासनस्तरावर शेतकऱ्यांना सोईचे व्हावे म्हणून या आधुनिक युगात आॅनलाईन सातबारा ताबडतोब मिळावा आणि त्याद्वारे कामे सोईस्कर व्हावी, या दृष्टीकोनातून शासनस्तरावर कितीतरी खर्च करण्यात आला. आणि जिल्हा पातळीवर आॅनलाईन प्रणाली पारदर्शकपणे व्हावी, असे निर्देश देण्यात आले. पण शासनस्तरावरील या आॅनलाईन पारदर्शकतेचा बट्याबोळ झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटन्सी यांच्या संयुक्त उपक्रमातून महाआॅनलाईन मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या महा- ई सेवा केंद्रातून शासनाने महसूल विभागातील विविध सेवांचा समावेश केलेला आहे. गावातील नागरिकांना कमी वेळेत सेवा चांगल्याप्रकारे मिळावी हा शासनाचा मानस आहे. परंतु वास्तविक सद्यस्थिती वेगळी आहे. आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्रात गेल्यानंतर त्यावर वेगळीच माहिती दिसत आहे. आजच्या परिस्थितीत सातबाऱ्यावर असलेली नोंद ही सन २०१३ पर्यंत अद्यावत असलेली आहे. यामध्ये शेतकऱ्याची भोगवटा नोंद, फेराफर नोंद, पीक पेरा नोंद, बँक बोझा या संबंधाने कुठल्याही प्रकारची अद्यावत माहिती नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय कामकाजामध्ये काम करताना अडचणी निर्माण होत आहे.सद्यस्थितीत शासनस्तरावर डिजीटलायझेशनचे काम चालु आहे. शासनाच्या महाभुमिलेख या आज्ञावलीमध्ये आॅनलाईन सातबारा नोंदणी संबंधाने शासनाने तहसील कार्यालयाला नोंदणी कक्ष चालु केले. परंतु शासनाने नोंदणी करताना तलाठी आॅफीसमधून मिळणारा हस्तलिखीत सातबारा देणेसुद्धा बंद केले. त्यामुळे शेतकऱ्यांना हस्तलिखीत सातबारा मिळण्यापासूनच वंचित रहावे लागत आहे. एकीकडे आॅनलाईनचा गाजावाजा असताना त्यामध्ये त्रुटी तर दुसरीकडे हस्तलिखीत सातबारा मिळण्यापासून शेतकरी वंचित आहेत. या शासकीय कामकाजात शेतकरीच होरपळला जात आहे. त्यामुळे शासनस्तरावर हा प्रश्न केव्हा निकाली निघणार, यामुळे शेतकरी कमालीचा चिंतेत पडला आहे. (वार्ताहर)