शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

केवळ १९ हजार शिधापत्रिकाधारकांची आॅनलाईन नोंद

By admin | Updated: May 29, 2015 01:39 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर सोपविण्यात आली.

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर सोपविण्यात आली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांची आॅनलाईन नोंद करण्याचा उपक्रम घेण्यात आला. मात्र आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील १७ लाख १२ हजार ६५० शिधापत्रिकाधारकांपैकी केवळ १९ हजार ८१३ जणांचीच आॅनलाईन नोंद झाले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्रामीण व शहरी क्षेत्रातील नागरिकांना अधिनियमाच्या तरतूदी नुसार धान्य मिळावे, गरजू अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकासह बँक खाते क्रमांक नोंद करण्याचे निर्देश पुरवठा विभागाने तहसील स्तरावरील यंत्रणेला दिले. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांची आॅनलाईन प्रक्रिया वर्षभरापासून सुरु आहे. यात बल्लारपूर तालुक्यात आजडघीला एक लाख २२ हजार ३२६ शिधापत्रिकाधारक व्यक्तीपैकी पाच हजार ३३७ जणांनी आॅनलाईन नोंद करुन जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. यामध्ये मूल तालुक्याचा शेवटचा क्रमांक असून ७८ हजार ४८७ शिधापत्रिकाधारकांपैकी केवळ १४८ व्यक्तींची आॅनलाईन नोंद केली आहे. केंद्र सरकारने एलपीजी अनुदानाच्या धर्तीवर धान्यावरील मिळणारे अनुदानही थेट बँक खात्यात जमा करण्याचे व शिधापत्रिकाधारक कुटुंबाला स्मार्ट कॉर्ड योजनेत समाविष्ट करण्याचे धोरण आखले आहे. यात स्वस्त धान्य दुकानदारावर नियंत्रण आणण्यासाठी ‘बॉयोमेट्रीक’ यंत्रणा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यामुळे शिधापत्रीका आधार क्रमांकासह निर्गमीत करुन बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. शिधापत्रिकेचा तपशिल आॅनलाईन होण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडे अर्जाचे वितरण करण्यात आले. मात्र सरकारी यंत्रणेच्या चालढकल सवयीमुळे यामध्ये प्रगती मंदावल्याचे दिसून येत आहे. अन्न सुरक्षा अधिनियम राबविण्यात स्वस्त धान्य दुकानांची महत्वाची भूमिका आहे. अशातच ‘बॉयोमेट्रीक’ पद्धत आणण्याच्या घोषणेमुळे त्यांच्यात नाराजी आहे. धान्याचा काळाबाजार रोखणे क्रमप्राप्त आहे. मात्र निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शिधापत्रिकाधारकांना धान्याचा पुरवठा केला जात नाही. शिधापत्रीकेतील समाविष्ट महिलेला कुटुंब प्रमुखाचा दर्जा यामुळेच देण्यात आला आहे. याचे प्रशासनन स्तरावर सुरू असून काही दिवसांत आॅनलाईन नोंद पूर्ण होईल.दक्षता समित्यांचे कार्य कागदावरचसार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी व वितरीत केलेल्या धान्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा, तालुका, स्वस्त धान्य दुकान, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावर दक्षता समित्या गठित आहेत. मात्र दक्षता समित्यांचे कार्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या काळ्याबाजारावर नियंत्रण आणू शकल्या नाही. परिणामी अन्न, नागरी पुरवठा विभागाला शिधापत्रिकाधारकांची नोंद आॅनलाईन करावी लागली आहे. या अधिनस्थ समित्यांचे कार्य कागदावरच ठरल्याचा हा परिणाम आहे.सात तालुक्याची कामगिरी निराशजनकशिधापत्रिकेतील समाविष्ट नावाची आॅनलाईन नोंद करण्यात जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, भद्रावती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी व चिमूर तालुक्याची कामगिरी निराशाजनक असल्याची बाब उघड झाली आहे. मूल मध्ये ७८ हजार ४८७ पैकी १४८, सिंदेवाही ८३ हजार ७२८ पैकी ३२२ , भद्रावती १ लाख ७ हजार १९ पैकी ४०४, कोरपना ८५ हजार ६५९ पैकी ४४१, राजुरा ८३ हजार ८२४ पैकी ४७१, गोंडपिपरी ६३ हजार २१८ पैकी ६४९ तर चिमूर तालुक्यातील एक लाख ६९ हजार ३४५ समाविष्ट असलेल्या शिधापत्रिकेतील नावापैकी केवळ ६६५, जणांची आॅनलाईन नोंद झाल्याचे दिसून येते. येथील अन्न पुरवठा निरीक्षकांवर कारवाईची टांगती तलावर लटकत आहे.