शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

महसूल वाढीसाठी ऑनलाईन जनसुनावणीचा खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात कुप्रसिध्द आहे. वायू, ध्वनीसोबतच जिल्ह्यात जलप्रदूषण भयंकर रुप धारण करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लिलाव करण्यात येणारे ३४ रेतीघाट आहेत. कोरोना संसर्गामुळे राज्य शासन आर्थिक विवंचनेत आले आहे. त्यामुळे महसूलवाढीसाठी विविध विभागावर दबाव टाकला जात आहे. प्रत्येक विभाग महसूल वाढीसाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्याप लिलाव झालेले नाही.

ठळक मुद्देकायद्यात तरतूदच नाही : पर्यावरणप्रेमींचा जोरदार विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे सध्या राज्य शासनाची तिजोरी रिकामी झाली आहे. त्यामुळे महसूलवाढीचा निर्देश शासनाने सर्व विभागांना दिले आहे. या महसूलवाढीसाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी चक्क जनसुनावणीच ऑनलाईन घेतली. रेतीघाट लिलावसारख्या संवेदनशिल विषयावर ही जनसुनावणी असल्याने याला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला.चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात कुप्रसिध्द आहे. वायू, ध्वनीसोबतच जिल्ह्यात जलप्रदूषण भयंकर रुप धारण करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लिलाव करण्यात येणारे ३४ रेतीघाट आहेत. कोरोना संसर्गामुळे राज्य शासन आर्थिक विवंचनेत आले आहे. त्यामुळे महसूलवाढीसाठी विविध विभागावर दबाव टाकला जात आहे. प्रत्येक विभाग महसूल वाढीसाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्याप लिलाव झालेले नाही. कोरोना संसर्गामुळे २३ मार्चलाच देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा गेला, मात्र रेतीघाटाचा लिलाव होऊ शकला नाही. आता महसूल वाढविण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे अचानक प्रशासनाला रेतीघाट लिलावाची आठवण झाली. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील रेतीघाट लिलावसंदर्भात जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन जनसुनावणी घेतली. मात्र पर्यावरणाशी निगडित संवेदनशिल विषयावर ऑनलाईन कशी काय घेण्यात येऊ शकते, असे म्हणत चंद्रपुरातील पर्यावरण प्रेमींना याला कडाडून विरोध केला. तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन यावर आपला आक्षेप नोंदविला.अवलंबित व्यक्तीच अनुपस्थितरेती घाटाचा संबंध नद्यांशी येतो. आणि नद्या अनेक जणांच्या उपजिविकेचे साधन आहेत. शेतकरीबांधव, मासेमारी करणारे व्यक्ती, गावखेड्यातील नागरिक या जनसुनावणीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र हा वर्ग गरीब आणि अज्ञानी असल्यामुळे ऑनलाईन जनसुनावणी तो उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्यांचा आक्षेप या जनसुनावणीत सहाजिकच ऐकून घेण्यात आला नाही, असा आरोप ग्रिन प्लॅनेटचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरणप्रेमी प्रा. योगेश दुधपचारे, सचिन वझलवार यांनी केला आहे.एनटीपीसीच्या वेबसाईटवर जागांचा उल्लेखच नाहीरेतीघाट लिलावासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या वेबसाईटवर सूचना टाकली आहे. लिलावाची तारीख व वेळ या वेबसाईटवर आहे. मात्र कोणत्या घाटाचा लिलाव आहे, त्याचा उल्लेख नाही. केवळ रेतीघाटांची संख्याच नमूद असल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. नदीचे पात्र, तेथील रेती व एकूण परिस्थितीचा अभ्यास करून तसा डाटा या वेबसाईटवर असायला हवा होता, असेही त्यांचे म्हणणे आहे.प्रशासन आणखी घाटांच्या लिलावाच्या तयारीतजिल्ह्यात अनेक घाटांवर बऱ्यापैकी रेती आहे. मात्र गावकऱ्यांचा आक्षेप व पर्यावरणाची समस्या लक्षात घेता अनेक घाटांचा लिलाव होत नाही. मात्र यावेळी अडीच लाख टन रेतीची मागणी असल्याचे सांगत प्रशासन जिल्ह्यात काही दिवसात आणखी काही घाटांचा लिलाव करण्याची शक्यताही आता पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.रेतीघाट लिलाव ही प्रक्रिया पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशिल आहे. त्यामुळे अशा विषयांवर जनसुनावणी ऑनलाईन घेण्यात येऊ नये. या जनसुनावणीत घाटांशी निगडित बरेच लोक अनुपस्थित असतात. सध्या देश कोरोनाशी सामना करीत आहे. यातून सर्व सावरल्यानंतर रेतीघाट लिलाव प्रक्रिया राबवावी, अशी आमची मागणी आहे. आमचा आक्षेप आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविला आहे.- प्रा. सुरेश चोपणे,अध्यक्ष ग्रिन प्लॅनेट, चंद्रपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या