शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

मध्यरात्रीपर्यंत चालली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ऑनलाईन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST

सावली ७२, भद्रावती ५८, पोंभुर्णा २५ तर बल्लारपूरमध्ये १३ जणांनी घेतले अर्ज मागे चंद्रपूर : जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक ...

सावली ७२, भद्रावती ५८, पोंभुर्णा २५ तर बल्लारपूरमध्ये १३ जणांनी घेतले अर्ज मागे

चंद्रपूर : जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तसेच उमेदवारांना चिन्ह वाटपाची ४ जानेवारी ही शेवटची तारीख होती. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे तालुकानिहाय किती उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, ही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, पोंभुर्णा तालुक्यात २५, बल्लारपूर १३, सावली ७२, भद्रावती तालुक्यातील ५८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर जिवती तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून, यासाठी ७ पुरुष तसेच ११ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावात राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बहुतांश गावामध्ये चढाओढ बघायला मिळाली आहे. अनेकांचे रुसवे-फुगवेही चव्हाट्यावर आले. दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया पार पाडताना प्रशासकीय यंत्रणेला चांगलाच घाम फुटला. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंतही काही तालुक्यातील उमेदवारांची अंतिम माहिती मिळू शकली नाही. तर भद्रावती तालुक्यात ५८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता ९९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सावली तालुक्यामध्ये ७२ जणांनी माघार घेतली असून, आता ८४९ उमेदवार, पोंभुर्णामध्ये २५ जणांनी अर्ज मागे घेतले असून ३९३, तर बल्लारपूर तालुक्यात १३ जणांनी अर्ज मागे घेतले असून, २६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, जिवती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी १८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ११ महिला तर ७ पुरुषांचा समावेश आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

६२९

---

एकूण प्रभागाची संख्या १९८१

--

बाॅत्स

सर्वाधिक उमेदवार असलेल्या ग्रामपंचायती

जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील माजरी, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, चिमूर तालुक्यातील नेरी या १७ सदस्यीय तसेच शंकरपूर ग्रामपंचायत १५ सदस्यीय आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीवर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत.

बाॅक्स

या ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष

चिमूर तालुक्यातील शंकरपूर या ग्रामपंचायतीकडे सध्या तरी सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे गाव काँग्रेसचे जि.प. गटनेते डाॅ. सतीश वारजूकर यांचे मूळ गाव आहे. दरम्यान, विसापूर, नेरी, माजरी या ग्रामपंचायतीकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---