शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीपर्यंत चालली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ऑनलाईन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST

सावली ७२, भद्रावती ५८, पोंभुर्णा २५ तर बल्लारपूरमध्ये १३ जणांनी घेतले अर्ज मागे चंद्रपूर : जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक ...

सावली ७२, भद्रावती ५८, पोंभुर्णा २५ तर बल्लारपूरमध्ये १३ जणांनी घेतले अर्ज मागे

चंद्रपूर : जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तसेच उमेदवारांना चिन्ह वाटपाची ४ जानेवारी ही शेवटची तारीख होती. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे तालुकानिहाय किती उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, ही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, पोंभुर्णा तालुक्यात २५, बल्लारपूर १३, सावली ७२, भद्रावती तालुक्यातील ५८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर जिवती तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून, यासाठी ७ पुरुष तसेच ११ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावात राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बहुतांश गावामध्ये चढाओढ बघायला मिळाली आहे. अनेकांचे रुसवे-फुगवेही चव्हाट्यावर आले. दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया पार पाडताना प्रशासकीय यंत्रणेला चांगलाच घाम फुटला. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंतही काही तालुक्यातील उमेदवारांची अंतिम माहिती मिळू शकली नाही. तर भद्रावती तालुक्यात ५८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता ९९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सावली तालुक्यामध्ये ७२ जणांनी माघार घेतली असून, आता ८४९ उमेदवार, पोंभुर्णामध्ये २५ जणांनी अर्ज मागे घेतले असून ३९३, तर बल्लारपूर तालुक्यात १३ जणांनी अर्ज मागे घेतले असून, २६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, जिवती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी १८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ११ महिला तर ७ पुरुषांचा समावेश आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

६२९

---

एकूण प्रभागाची संख्या १९८१

--

बाॅत्स

सर्वाधिक उमेदवार असलेल्या ग्रामपंचायती

जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील माजरी, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, चिमूर तालुक्यातील नेरी या १७ सदस्यीय तसेच शंकरपूर ग्रामपंचायत १५ सदस्यीय आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीवर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत.

बाॅक्स

या ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष

चिमूर तालुक्यातील शंकरपूर या ग्रामपंचायतीकडे सध्या तरी सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे गाव काँग्रेसचे जि.प. गटनेते डाॅ. सतीश वारजूकर यांचे मूळ गाव आहे. दरम्यान, विसापूर, नेरी, माजरी या ग्रामपंचायतीकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---