वेकोलिचा निषेध : ३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणराजुरा : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या निषेधार्थ धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भगंगपूर, माथरा येथील एक हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी आज गुरुवारपासून राजुरा येथील तहसील कार्यालयापुढे उपोषणाला बसलेले आहे.मागील पाच वर्षापासून जमिनी संपादित केल्या, सेक्शन ९ लावण्यात आले. मात्र वेकोलि व शासनाच्या दिरंगाईमुळे येथील शेतकरी संतप्त झाले असून जोपर्यंत मोबदला व नोकरी मिळणार नाही, तोपर्यंत लढा सुरु ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केल्यामुळे त्या जमिनीवर कर्ज मिळत नाही. जमिनी विकू शकत नाही, अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न करण्यास विलंब होत असून अनेक वेळा मोर्च काढले, धरणे दिले. परंतु शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे गुरुवारपासून उपोषण सुरु करण्यात आहे. ३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी विजय चन्ने, बाळू जुलमे, विलास घटे, बालाजी कुबडे, राजु मोहारे, अनिल पायघन, शालू पिंपळकर, मनिषा बोबडे आदींनी दिली. (शहर प्रतिनिधी)साखरीच्या प्रकल्पग्रस्तांवर अन्यायवेकोलिचे अधिकारी केवळ शेतकऱ्यांची लूट करीत असून साखरी येथील शेतकरी निर्मला चौधरी, शेषराव बोंडे, शिला खिरटकर, बंडू धारणे, मोहन धारणे, यांच्या जमिनी घेतल्या. काम सुरु केले. परंतु कुणाला पैसे दिले तर नोकरी दिली नाही. नोकरी दिली तर पैसे दिले नाही. केवळ पोकळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असून साखरी, धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुबई, चिचोंलीचे प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
एक हजार प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरु
By admin | Updated: February 3, 2017 01:01 IST