शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ल्यात एक ठार

By admin | Updated: July 17, 2016 00:32 IST

येथून जवळच असलेल्या नागापूर फाट्यावर १५ जुलै रोजी रात्री ८.१५ च्या दरम्यान पालडोह येथील ...

एक जखमी : दुचाकीस्वारांना नागापूर फाट्याजवळ अडविलेजिवती : येथून जवळच असलेल्या नागापूर फाट्यावर १५ जुलै रोजी रात्री ८.१५ च्या दरम्यान पालडोह येथील शिवाजी नामदेव गिते (३८) व विजय भाऊराव राठोड हे दोघेही दुचाकीने जिवतीकडे येत असताना फाट्यावर दडून बसलेल्या अज्ञात आरोपींनी चाकू हल्ला केला. त्यात शिवाजी नामदेव गिते याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय भाऊराव राठोड जखमी झाले.शिवाजी गिते व विजय राठोड हे दोघेही पालडोह येथील रहिवासी असून शुक्रवारी रात्री ८ वाजतादरम्यान पाण्याची मोटार बिघडल्याने दोघेही दुचाकीने पालडोहवरुन जिवतीकडे मेकॅनिकला घेवून जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यावरच्या नागापूर फाट्यावर आधीच दडून बसलेल्या अज्ञात दोन आरोपींनी शिवाजी गिते व विजय राठोड यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार करून शिवाजी गिते यांची हत्या केली. तर विजय राठोड यांना खांद्यावर व मांडीवर चाकूने वार केल्याने तेही जखमी झाले. जखमी अवस्थेतच विजय राठोड यांनी नागापूर गावाकडे धाव घेत नातेवाईकांना फोनने बोलावले. तोपर्यंत अज्ञात आरोपी दुचाकीने पसार झाले.या घटनेची माहिती तात्काळ जिवती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार जिवती पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिवाजी नामदेव गिते यांचा मृतदेह ताब्यात घेतला. जखमी विजय राठोड यांना उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध जिवती पोलिसात ३०२ चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास जिवती पोलीस ठाण्याचे ठाणेदार के.बी. शेळके व त्यांचे सहकारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)घटनेनंतर गावात हळहळस्वत:चे मालवाहू (पिकअ‍ॅप) वाहन चालवून गुण्यागोविंदाने संसाराचा गाडा चालविणाऱ्या शिवाजी गितेवर चाकू हल्ला करून हत्या केल्याने पालडोह व इतर नातेवाईकांत शोककळा पसरली आहे. त्यांची हत्या का केली असावी, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.पोलिसांनी कठोर होणे गरजेचेकायद्याच्या चिंधड्या उडवित सर्वसामान्य नागरिकांवर वर्दळीच्या रस्त्यावर हल्लेखोर चाकू हल्ला करून हत्या करण्यासारखे प्रकार घडवितात. हा प्रकार अतिशय गंभीर असून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.