शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वसूचना न देता एक दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:48 IST

नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.

ठळक मुद्देचंद्रपूरकरांचे हाल : ऐनवेळी नळ न आल्याने करावी लागते भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याचे कंत्राट आहे. चंद्रपुरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमिता राहिली आहे. दरवर्षीच चंद्रपुरात पाण्यासाठी बोंबा मारल्या जातात. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने इरई धरणात पाण्याचा साठा कमी आहे. मात्र उन्हाळ्यात हा जलसाठा चंद्रपूरकरांना पुरु शकतो. मागील वर्षी इरई धरणाची याहून बिकट स्थिती होती. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा का, यासाठी सभा घेतली होती. सर्व विचाराअंती सभेत शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा थोडी स्थिती बरी आहे. तरीही मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय शहरातील तुकूम परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाबुपेठ परिसर, नगिना बाग आदी भागात तर दोन-दोन दिवस नळ येत नाही.विशेष म्हणजे, शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे की कंत्राटी कंपनीने परस्पर हा निर्णय घेतला आहे, हेच नागरिकांना समजेणासे झाले आहे. मनपाने हा निर्णय घेतला असेल तर त्याची पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही. त्यामुळे तयारीत नसलेल्या नागरिकांना ऐनवेळी न आल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते.पाणी पुरवठाही कमीशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.