शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

पूर्वसूचना न देता एक दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:48 IST

नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.

ठळक मुद्देचंद्रपूरकरांचे हाल : ऐनवेळी नळ न आल्याने करावी लागते भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याचे कंत्राट आहे. चंद्रपुरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमिता राहिली आहे. दरवर्षीच चंद्रपुरात पाण्यासाठी बोंबा मारल्या जातात. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने इरई धरणात पाण्याचा साठा कमी आहे. मात्र उन्हाळ्यात हा जलसाठा चंद्रपूरकरांना पुरु शकतो. मागील वर्षी इरई धरणाची याहून बिकट स्थिती होती. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा का, यासाठी सभा घेतली होती. सर्व विचाराअंती सभेत शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा थोडी स्थिती बरी आहे. तरीही मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय शहरातील तुकूम परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाबुपेठ परिसर, नगिना बाग आदी भागात तर दोन-दोन दिवस नळ येत नाही.विशेष म्हणजे, शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे की कंत्राटी कंपनीने परस्पर हा निर्णय घेतला आहे, हेच नागरिकांना समजेणासे झाले आहे. मनपाने हा निर्णय घेतला असेल तर त्याची पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही. त्यामुळे तयारीत नसलेल्या नागरिकांना ऐनवेळी न आल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते.पाणी पुरवठाही कमीशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.