शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पूर्वसूचना न देता एक दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:48 IST

नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.

ठळक मुद्देचंद्रपूरकरांचे हाल : ऐनवेळी नळ न आल्याने करावी लागते भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याचे कंत्राट आहे. चंद्रपुरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमिता राहिली आहे. दरवर्षीच चंद्रपुरात पाण्यासाठी बोंबा मारल्या जातात. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने इरई धरणात पाण्याचा साठा कमी आहे. मात्र उन्हाळ्यात हा जलसाठा चंद्रपूरकरांना पुरु शकतो. मागील वर्षी इरई धरणाची याहून बिकट स्थिती होती. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा का, यासाठी सभा घेतली होती. सर्व विचाराअंती सभेत शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा थोडी स्थिती बरी आहे. तरीही मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय शहरातील तुकूम परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाबुपेठ परिसर, नगिना बाग आदी भागात तर दोन-दोन दिवस नळ येत नाही.विशेष म्हणजे, शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे की कंत्राटी कंपनीने परस्पर हा निर्णय घेतला आहे, हेच नागरिकांना समजेणासे झाले आहे. मनपाने हा निर्णय घेतला असेल तर त्याची पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही. त्यामुळे तयारीत नसलेल्या नागरिकांना ऐनवेळी न आल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते.पाणी पुरवठाही कमीशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.