शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

एक कोटीची नळयोजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:34 IST

एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीचे पात्र कोरडे : शहरातील विविध वॉर्डांमध्ये जलसंकट

बी. यू. बोर्डेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.शहरात ३ हजार नळधारक आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. पण, पाणीच मिळत नसल्यामुळे भर उन्हाळ्यात शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी सोमनाथपूर, नेहरु चौक वॉर्डासह अन्य काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला़ राजुरा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वर्धा नदीच्या पात्रात सोडून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु नदीचे पाणी आटल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. शहराला लागून असलेले निजामकालीन तलावसुद्धा आटत आहे. पाणीच मिळत नसल्याने थंड पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. विंधन विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. नगर परिषदेने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून पर्यायी स्त्रोत तयार केले नाहीत. वर्धा नदीच्या भरोशावरच असल्याने ही समस्या निर्माण झाली. वाढती गरज लक्षात घेऊन न. प. ने. नियोजन केल्याशिवाय समस्या सुटणार नाही.