शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

एक कोटीची नळयोजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:34 IST

एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीचे पात्र कोरडे : शहरातील विविध वॉर्डांमध्ये जलसंकट

बी. यू. बोर्डेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.शहरात ३ हजार नळधारक आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. पण, पाणीच मिळत नसल्यामुळे भर उन्हाळ्यात शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी सोमनाथपूर, नेहरु चौक वॉर्डासह अन्य काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला़ राजुरा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वर्धा नदीच्या पात्रात सोडून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु नदीचे पाणी आटल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. शहराला लागून असलेले निजामकालीन तलावसुद्धा आटत आहे. पाणीच मिळत नसल्याने थंड पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. विंधन विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. नगर परिषदेने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून पर्यायी स्त्रोत तयार केले नाहीत. वर्धा नदीच्या भरोशावरच असल्याने ही समस्या निर्माण झाली. वाढती गरज लक्षात घेऊन न. प. ने. नियोजन केल्याशिवाय समस्या सुटणार नाही.