शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जुन्यांचा पत्ता नाही, नव्यांची लागवड

By admin | Updated: August 28, 2015 01:19 IST

ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवली.

वृक्ष लागवड योजना : ग्रामपंचायतींचा केवळ देखावाचंद्रपूर : ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा गतवर्षी जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला. अनेक ग्रामपंचायतीनी वृक्ष लागवड न करताच निधीची उचल केली. एकाही ग्रामपंचायतीकडे जगलेल्या वृक्षांचा आकडा उपलब्ध नाही. ग्रामपंचायतींची चौकशी झाली. मात्र त्याचाही फायदा झाला नाही. आता पून्हा नव्याने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेर्तंगत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले जाते. या उद्दीष्टानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवड करायची असते. मात्र केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीनी या योजनेचा मार्ग अवलंबिला आहे. उद्दीष्टानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाते. दरवर्षी खड्डे खोदून वृक्ष लागवड होत असली तरी जगलेल्या वृक्षांचा पत्ता नाही. शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला १४ लाख ६४ हजार ९६५ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी ३० जानेवारी २०१५ पर्यंत ४८९ ग्रामपंचायतींमार्फंत ५ लाख २३ हजार ७४१ वृक्ष लावल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. यासाठी ७ लाख ६३ हजार ५४ खड्डे खोदल्याचीही नोंद आहे. ही प्रक्रिया सुरुच असली तरी जगलेल्या झाडांचा मात्र पत्ता नाही, अशी स्थिती आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आपण वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केल्याचे दाखवून शासकीय निधीची उचल करीत आहे. चालू वर्षात जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट अद्याप मिळालेले नाही. मात्र पावसाळा सुरू होताच वृक्ष लागवडीला प्रारंभ होत असते. ज्या ठिकाणी वृक्ष करपली, त्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवड केली जात असल्याचे रोहयोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)