शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दफ्तर दिरंगाई

By admin | Updated: November 28, 2015 02:11 IST

कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालय स्थायीक नसून इतर तालुक्यातून अप-डाऊन करीत असतात.

अनेक कामांचा खोळंबा : वणी व राजुरातून कर्मचारी करतात अप-डाऊनकोरपना : कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालय स्थायीक नसून इतर तालुक्यातून अप-डाऊन करीत असतात. यामध्ये डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांपासून सर्वच क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होत असून नागरिकांना विविध कामे करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.सहाव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा मोठ्या पगाराची मिळकत होत असल्याने त्यांचे राहणीमान निश्चितच उंचावले आहे. ही बहुतेक मंडळी आपली कुटूंबे पॉश शहरात वास्तव्यास ठेवून दुचाकी वाहनाने ३० ते ४० किमी अंतरावरील आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात. अशा दैनंदिन प्रवाशी कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येते. यात शिक्षक वर्ग आघाडीवर असून कोरपना व परिसरातील गावात नोकरीवर असणारे शिक्षक थेट वणी, यवतमाळ, राजूरा व गडचांदूर येथून ये-जा करणारे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना शासन घरभाडे भत्ता देत असते. मात्र या भत्त्यास सदर कर्मचारी खरोखरच पात्र आहेत काय, याची शहानिशा करणे येथील वरिष्ठ अधिकारी महत्त्वाचे समजत नाही. किंबहुना, कोरपनाचे वरिष्ठ अधिकारी स्वत:च मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा हा प्रकार तालुक्यात सुरू आहे.दरम्यान, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांच्या कामातील दिरंगाई वाढत आहे. ही बाबसुद्धा वरिष्ठ अधिकारी दुर्लक्षित करीत आहेत. कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तर चक्क एक चार चाकी वाहनच भाड्याने घेतल्याचे समजते. ही सर्व मंडळी राजुरा ते कोरपना असा सुमारे ४५ किमीचा रोज प्रवास करीत असतात. मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही त्यांना नियमित घरभाडे भत्ता अदा होत असल्याची माहिती आहे. हे सारे येथील तहसिलदारांना माहित असूनही त्यांना घरभाडे मिळते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.तलाठी सारख्या महत्त्वाच्या पदावर असणारे कर्मचारीसुद्धा बाहेर गावाहून ये-जा करतात. तलाठी साहेबकधी घरून निघालेले असतात मात्र, कार्यालयात पोहचलेले नसतात. दुसरीकडे कार्यालयातूनच आताच बाहेर गेल्याचे सहकारी सांगतात. अशा वेळी गरजुवंतांना सतत हेलपाटे खावे लागतात. या हेलपाट्या व्यतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून द्यावी लागणारी ‘दक्षिणा’ ती वेगळीच. अर्थात याला येथील काही तलाठी अपवादही आहेत. मात्र त्यांची संख्या नगण्य आहे. (तालुका प्रतिनिधी)