शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

११ वाजूनही कार्यालय बंदच !

By admin | Updated: June 18, 2016 00:33 IST

गाव खेड्यात विकासाची गंगा पोहोचविणाऱ्या पंचायत समिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांची कशी होरपळ होते,

जिवती पंचायत समिती : पदाधिकारी-अधिकारी गायबशंकर चव्हाण जिवतीगाव खेड्यात विकासाची गंगा पोहोचविणाऱ्या पंचायत समिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांची कशी होरपळ होते, याचे उत्तम उदाहरण ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींग आॅपरेशन दरम्यान दिसून आले. सकाळचे ११ वाजूनही कार्यालय कुलूपबंद अवस्थेत होते. त्यामुळे येथील पंचायत समिती कार्यालयाचे पितळ उघडे पडले आहे. शासनाने कामचुकार अधिकाऱ्यावर लगाम लावण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात बॉयोमेट्रीक मशिन लावली आहे. जेणेकरून कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येतील आणि लोकांचे कामेसुद्धा वेळेवर होतील, हा शासनाचा उद्देश होता. मात्र या उद्देशालाच हरताळ फासली जात असल्याचा प्रकार येथे पहायला मिळला. कार्यालयात लावण्यात आलेली बॉयोमेट्रीक मशिन बंद पडली आहे. तर अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांवर वचक नाही. प्रशासनात ताळमेळ नाही.यामुळे कर्मचारी कधीही येवून आपल्या सह्या करीत असल्याचा प्रकार येथे दिसून आला. गेल्या अनेक दिवसांपासून पहाडावरील अनेक गावगुडे पाणी टंचाईने होरपळत आहेत. पाण्याची सोय करून द्या, बंद पडलेले पाण्याचे स्त्रोत चालू करा, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र या तक्रारी फाईल बंद पडल्या आहेत. याबाबत पाणी टंचाई विभागाच्या लिपीकाला नागरिक वारंवार विचारतात. पण समाधानकारक उत्तर कधीच मिळत नाही. कार्यालयात कर्मचारी लवकर येत नाही व लोकांची कामेही करीत नसल्याची ओरड सुरू आहे. हा प्रकार पाणी टंचाई विभागाच्या कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर बहुतांश कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. मात्र हे सर्व घडत असताना लोकप्रतिनिधी मात्र मुग गिळून बसले आहेत. तर काही प्रतिनिधी आपली पॉवर दाखवित खिशा गरम करीत असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन संबधींतावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्षपंचायत समिती लोकप्रतिनिधीच्या देखरेखीखाली जनतेची कामे सुलभ पद्धतीने व्हावी, अशी जनतेची मापक अपेक्षा असते. पण तसे कधी झाले नाही. तक्रार केली की त्याला, लगेच पदाधिकारी आपल्या कॅबीनमध्ये बोलावतात. त्यांना काही सूचना देत आपल चांगभल करून घेतात. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी सुद्धा अधिकाऱ्यांच्या विरोधात जात नाही.स्वच्छतेची एैसीतैसीकार्यालय व परिसर स्वच्छ रहावे, जेणेकरून डासाची उत्पत्ती होणार नाही, यासाठी प्रत्येक गावात पंचायत समिती व ग्राम पंचायत अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. पण लोकांना ज्ञान देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्याच कार्यालयाचा अंधार मात्र झाकून ठेवला आहे. शौचालयात पाण्याची सोय नाही, परिसर स्वच्छ नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून खर्रा व तंबाखूच्या पिचकारीने भिंती रंगल्या आहेत.