शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट

By admin | Updated: October 7, 2016 01:03 IST

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

राजकुमार चुनारकर चिमूरराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सन २०१६-१७ या वर्षात हे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्ह्यातील पंधराही पंचायत समिती व कृषी विभाग कामाला लागले आहेत.कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या व आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने देशाचा विकास नद्या, नाले, दऱ्याखोरे आणि जंगल या साधन संपत्तीवर अवलंबून आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. जी वनसंपदा आहे ती नष्ट होऊ नये, या संपत्तीचे संवर्धन व वापर नियोजनपूर्वक झाले पाहिजे. तसेच जंगलतोड थांबण्यासाठी जनतेला पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून बायोगॅस संयंत्र उभारणीवर अधिक भर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास प्रकल्पांतर्गत ही कामे केली जाणार आहे. राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत आहे. केंद्र शासनाकडून प्रतिवर्ष निर्गमित केल्या जाणाऱ्या प्रशासकीय मंजुरी आदेशातील मार्गदर्शक सूचनानुसार बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळते. सर्वसाधारण लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास ९ हजार रुपये, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास ११ हजार रुपये अनुदान मिळते. विशेष म्हणजे, शौचालय जोडलेल्या बायोगॅस संयत्रास अतिरिक्त केंद्रीय सहाय्य म्हणून बाराशे रुपये मिळतात. या योजनेमध्ये बॉयोगॅस पुरविणे, एलपीजी व इतर पारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे, रासायनिक खताचा वापर कमी करुन सेंद्रीय खताचा वापर करण्यास लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे, ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे. बायोगॅस संयत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत होते. तसेच या सेंद्रीय खतामुळे जमिनीची पोत सुधारत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.गोबरगॅस काळाची गरजगोबर गॅस स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस मिळण्याचे सर्वात स्वस्त साधन आहे. गावखेड्यात स्वयंपाकासाठी आजही इंधन म्हणून लाकूड, गोवऱ्या, पिकाचे अवशेष (तुराट्या) याचा वापर केला जातो. या पारंपारिक इंधनाच्या वापरासही मर्यादा असून सदर इंधन हे सहज उपलब्ध होणे कठीण झालेले आहे. या इंधनाचा वापर आरोग्यास हानिकारक आहे. पिकाच्या अवशेषाचा इंधन म्हणून वापर करणेही योग्य नाही. आधीच रासायनिक खतामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. यामुळे गोबर गॅस आजची गरज बनली आहे.