शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट

By admin | Updated: October 7, 2016 01:03 IST

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

राजकुमार चुनारकर चिमूरराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सन २०१६-१७ या वर्षात हे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्ह्यातील पंधराही पंचायत समिती व कृषी विभाग कामाला लागले आहेत.कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या व आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने देशाचा विकास नद्या, नाले, दऱ्याखोरे आणि जंगल या साधन संपत्तीवर अवलंबून आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. जी वनसंपदा आहे ती नष्ट होऊ नये, या संपत्तीचे संवर्धन व वापर नियोजनपूर्वक झाले पाहिजे. तसेच जंगलतोड थांबण्यासाठी जनतेला पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून बायोगॅस संयंत्र उभारणीवर अधिक भर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास प्रकल्पांतर्गत ही कामे केली जाणार आहे. राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत आहे. केंद्र शासनाकडून प्रतिवर्ष निर्गमित केल्या जाणाऱ्या प्रशासकीय मंजुरी आदेशातील मार्गदर्शक सूचनानुसार बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळते. सर्वसाधारण लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास ९ हजार रुपये, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास ११ हजार रुपये अनुदान मिळते. विशेष म्हणजे, शौचालय जोडलेल्या बायोगॅस संयत्रास अतिरिक्त केंद्रीय सहाय्य म्हणून बाराशे रुपये मिळतात. या योजनेमध्ये बॉयोगॅस पुरविणे, एलपीजी व इतर पारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे, रासायनिक खताचा वापर कमी करुन सेंद्रीय खताचा वापर करण्यास लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे, ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे. बायोगॅस संयत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत होते. तसेच या सेंद्रीय खतामुळे जमिनीची पोत सुधारत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.गोबरगॅस काळाची गरजगोबर गॅस स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस मिळण्याचे सर्वात स्वस्त साधन आहे. गावखेड्यात स्वयंपाकासाठी आजही इंधन म्हणून लाकूड, गोवऱ्या, पिकाचे अवशेष (तुराट्या) याचा वापर केला जातो. या पारंपारिक इंधनाच्या वापरासही मर्यादा असून सदर इंधन हे सहज उपलब्ध होणे कठीण झालेले आहे. या इंधनाचा वापर आरोग्यास हानिकारक आहे. पिकाच्या अवशेषाचा इंधन म्हणून वापर करणेही योग्य नाही. आधीच रासायनिक खतामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. यामुळे गोबर गॅस आजची गरज बनली आहे.