शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी शेतकऱ्यांनाही हव्यात कृषी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST

नागभीड : जिल्ह्यात ओबीसी वर्गातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. अनु.जाती जमातीमधील शेतकऱ्यांप्रमाणेच ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांनाही शेती विकासासाठी योजना ...

नागभीड : जिल्ह्यात ओबीसी वर्गातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. अनु.जाती जमातीमधील शेतकऱ्यांप्रमाणेच ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांनाही शेती विकासासाठी योजना अमलात आणण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होत चालले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतरही पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. पण सिंचनाच्या अपुऱ्या सोयींमुळे निसर्गावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातही काही शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन किंवा कर्ज काढून आपल्या शेतात विहीर बांधकाम व कुपनलिका खोदून सिंचन करण्याचा प्रयत्न केला आहे.

काही शेतकऱ्यांच्या मागील २० ते २५ वर्षांपासून खोदलेल्या विहिरी व कुपनलिका खचल्याने दुरुस्तीसाठी आलेल्या आहेत. एकीकडे शेतीतून उत्पन्न निघत नाही तर दुसरीकडे हातात आलेले पीक निसर्ग आपल्या लहरीपणामुळे हिरावून घेतो, अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी फसलेला आहे. मोठ्या प्रमाणावर गरिबी असल्याने आर्थिक विवंचनेमुळे शेतातील दुरुस्ती करणे अवघड झाले आहे. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना घोषित केलेल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी हे ओबीसी समाजातील असूनही त्यांच्यासाठी एकही शाश्वत योजना नसल्याने असंतोष निर्माण होत आहे .

बॉक्स

असे आहे अनुदान

अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तर अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे. या योजनेंतर्गत नवीन विहीर २.५० लक्ष रु., जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रु., ईनवेल बोअरिंग .२० हजार , पंपसंच २० हजार , वीज जोडणी आकार १० हजार , शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण १ लक्ष, व सूक्ष्म सिंचन संच ( ठिबक सिंचन संच ५० हजार किंवा तुषार सिंचन संच २५ हजार ) , पीव्हीसी पाईप रु. ३० हजार , परसबाग रु. ५०० या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. पण ओबीसी शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अशा कुठल्याही प्रकारच्या योजना नसल्याने शेवटी सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे व कर्जबाजारी व्हावे लागत आहे.

कोट

ओबीसी शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न व सबलीकरण करण्याच्या दृष्टीने इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांप्रमाणेच योजना देण्याची गरज आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणारी जिल्हा नियोजन समितीची सभा २५ जानेवारी २०२१ रोजी होत आहे. या सभेत अनु.जाती, जमातीतील शेतकऱ्यांच्या धर्तीवर ओबीसी शेतकऱ्यांच्या योजनांसाठी तरतूद करावी.

- संजय गजपुरे, जि.प. सदस्य.