शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

नुपूर धमगाये हिने मारली बाजी

By admin | Updated: May 31, 2017 00:55 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-२०१७मध्ये घेतलेल्या इयत्ता १२वीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८८३२ टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-२०१७मध्ये घेतलेल्या इयत्ता १२वीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८८३२ टक्के लागला आहे. त्यात मुलींनी वर्चस्व राखले आहे. स्थानिक जनता महाविद्यालयाची विद्यार्थिनी नुपूर महेंद्र धमगाये हिने ९४.४६ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर तुकूम येथील मातोश्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम मारोती वराटकर याला ९४.३० टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २९ हजार ७९० विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी २९ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २६ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये नोंदणी करणारे १५ हजार ३०५ विद्यार्थी आणि १४ हजार ४८५ विद्यार्थिनींनी होत्या. त्यापैकी १५ हजार २८७ मुले व १४ हजार ४८० मुलींनी परीक्षा दिली. निकालामध्ये १३ हजार १०६ विद्यार्थी व १३ हजार १८३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा कमी मुलींनी परीक्षा दिली तरी उत्तीर्ण मुलींची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा मुलगीच आली आहे. ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची तेजश्री नागदेवते हिने ९४.१५ टक्के गुण मिळविले आहेत. ती ब्रह्मपुरी तालुक्यातून अव्वल आली आहे. वरोरा तालुक्यातून आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा तण्मय पापडे यानी सर्वाधिक ९२.१५ गुण पटकाविले आहेत. भद्रावती तालुक्यातून आदित्य बोंडगुलवार पहिला आला आहे. त्याने ९०.६२ टक्के गुण मिळविले आहेत. बल्लारपूर तालुक्यातून तृप्ती नागपुरे हिने सर्वाधिक ८५.७० टक्के गुण मिळविले आहेत. नुपूरचे डॉक्टर बनण्याचे स्वप्नचंद्रपूर : १२ वीच्या निकालात चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम आलेल्या जनता महाविद्यालयातील नुपूर धमगाये हिला वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे. त्याकरिता तिने ‘नीट’ची तयारी केली आहे. तिला डॉक्टर बनून जनतेची सेवा करायची आहे. नुपूरची मोठी बहिण डॉ.आदिती धमगाये हीसुद्धा डॉक्टर असल्याने तिच्या पाऊल वाटेवर पाऊल टाकायचे आहे. नुपूरचे वडील महेंद्र धमगाये हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता आहेत. तर आई माया धमगाये या प्राध्यापिका आहेत. नुपूरने नियोजन करुन दररोज पाच ते सहा तास सातत्याने अभ्यास केला. नुपूरच्या आईने तिला अभ्यासात मदत केली. नुपूरचे आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. नुपूरला अवांतर वाचनाचा छंद असून अनेक थोर नेत्यांचे आत्मचरित्र तसेच कांदबरी वाचन करायला आवडते. त्याचबरोबर ती फावल्या वेळात टीव्हीवरील कार्यक्रम पाहात असते. नुपूरने विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, नियमित व नियोजनबद्ध अभ्यास केल्याने कोणतीही परीक्षा यशस्वी करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्याने अभ्यास करावा, असे तिने सांगितले.वाणिज्यमध्ये सलेहा व कलामध्ये अक्षय आघाडीवरजिल्ह्यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल ८८.०१ टक्के लागला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाची सलेहा आरिफ शेख हिने ८९.८४ टक्के गुण घेऊन अव्वल स्थान पटकाविले आहे. तसचे कला शाखेचा निकाल ८२.६६ टक्के आहे. या शाखेत जनता महाविद्यालयाचा अक्षय दिनकर अलोणे याने ८८.७६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या शाखेत ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाची शिल्पा दुपारे हिने ८६ .९२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.राजुरा तालुक्याचा सर्वाधिक ९१.९४ टक्के निकालजिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये राजुरा तालुक्याचा सर्वाधिक ९१.९४ टक्के निकाल लागला आहे. २ हजार १५८ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल पोंभुर्णा तालुक्याचा आहे. तेथे ८१.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या तुलनेत जिवती, कोरपना या आदिवासी बहुल तालुक्यांचा निकाल सरस ठरला आहे. ब्रह्मपुरीचा निकालही समाधान करण्यासारखा नाही. या तालुक्यात ८२.८० टक्के निकाल आहे.पुनर्परीक्षेचा निकाल ४४.०७ टक्केबारावीमध्ये जिल्ह्यात पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा निकाल ४४.०७ टक्के लागला आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा सर्वाधिक ६६.८९ टक्के, वाणिज्य ४३?६६, कला ३८.३६ आणि व्होकेशनल शाखेचा निकाल २८.४२ टक्के लागला आहे. १ हजार ४०९ विद्यार्थ्यानी पुन्हा परीक्षा दिल्यावर ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.