शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजाराला मनपाचे पाठबळ

By admin | Updated: November 13, 2014 22:58 IST

सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात

‘ती’ वाहनेही गायब : घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडलेरवी जवळे - चंद्रपूरसध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात असतानाही घाणीचा विळखा सुटू शकला नाही. मनपाने कचरा उचलण्याचे कंत्राट दिले, मात्र कचरा उचलला जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कंत्राट दिले. परंतु तेही सुरू होऊ शकले नाही. एकूणच घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. साथीच्या आजाराला मनपा जणू पाठबळच देत आहे, हे यावरून दिसून येते.मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक जणांना डेंग्यू, मलेरिया यासारख्या डासांपासून पसरविणाऱ्या आजाराने ग्रासले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी खासगी रुग्णालयात अनेक जण उपचार घेत आहेत. गावागावात, शहरात पसरलेली अस्वच्छताच याला कारणीभूत आहे, हेदेखील निर्विवाद सत्य आहे. असे असतानाही स्वच्छतेबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती उदासीन का, हे समजेणासे झाले आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृतीचा अभाव आहे. मात्र चंद्रपूरसारख्या शहरातही अशीच परिस्थिती राहावी, याचे आश्चर्य वाटते. शहराची स्वच्छता अबाधित रहावी व शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी महानगरपालिकेकडून लाखोंचा खर्च केला जात आहे. शहरातून दररोज कचरा उचलून तो डम्पींग यार्डमध्ये टाकण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंत्राट दिल्यानंतर काही महिन्यात या कंपनीने अटी व शर्थीनुसार नवीन कोरी वाहने आणली. प्रारंभी कचरा उचलण्याचे काम निट सुरू राहिले. मात्र कालांतराने गल्लीबोळात दिसणारी कचरा उचलणारी ही वाहने कमी होत गेली. मागील एक दोन महिन्यात कचरा उचलण्याच्या कामात चांगलीच अनियमिता आली आहे. सध्या तर अनेक वार्डात कचरा दोनदोन दिवस पडून असलेला दिसतो. कचरा उचललाही तरी तो नीट उचलला जात नाही. त्यामुळे चंद्रपुरातील अनेक वार्डात सध्या डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. गावात स्वच्छता असली की गावाचे सौंदर्य वाढते. गावात निटनेटकेपणा येतो. शिवाय गावाचे आरोग्यही सुदृढ असते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वच्छतेचा कानमंत्र दिला. मात्र चंद्रपूरसारख्या शहरात याला हरताळ फासला जात आहे. ठिकठिकाणी कचरा पडून असलेला दिसतो. परिणामी चंद्रपुरातही साथीचे आजार असेच फोफावत राहणार काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.