शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजाराला मनपाचे पाठबळ

By admin | Updated: November 13, 2014 22:58 IST

सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात

‘ती’ वाहनेही गायब : घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडलेरवी जवळे - चंद्रपूरसध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात असतानाही घाणीचा विळखा सुटू शकला नाही. मनपाने कचरा उचलण्याचे कंत्राट दिले, मात्र कचरा उचलला जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कंत्राट दिले. परंतु तेही सुरू होऊ शकले नाही. एकूणच घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. साथीच्या आजाराला मनपा जणू पाठबळच देत आहे, हे यावरून दिसून येते.मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक जणांना डेंग्यू, मलेरिया यासारख्या डासांपासून पसरविणाऱ्या आजाराने ग्रासले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी खासगी रुग्णालयात अनेक जण उपचार घेत आहेत. गावागावात, शहरात पसरलेली अस्वच्छताच याला कारणीभूत आहे, हेदेखील निर्विवाद सत्य आहे. असे असतानाही स्वच्छतेबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती उदासीन का, हे समजेणासे झाले आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृतीचा अभाव आहे. मात्र चंद्रपूरसारख्या शहरातही अशीच परिस्थिती राहावी, याचे आश्चर्य वाटते. शहराची स्वच्छता अबाधित रहावी व शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी महानगरपालिकेकडून लाखोंचा खर्च केला जात आहे. शहरातून दररोज कचरा उचलून तो डम्पींग यार्डमध्ये टाकण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंत्राट दिल्यानंतर काही महिन्यात या कंपनीने अटी व शर्थीनुसार नवीन कोरी वाहने आणली. प्रारंभी कचरा उचलण्याचे काम निट सुरू राहिले. मात्र कालांतराने गल्लीबोळात दिसणारी कचरा उचलणारी ही वाहने कमी होत गेली. मागील एक दोन महिन्यात कचरा उचलण्याच्या कामात चांगलीच अनियमिता आली आहे. सध्या तर अनेक वार्डात कचरा दोनदोन दिवस पडून असलेला दिसतो. कचरा उचललाही तरी तो नीट उचलला जात नाही. त्यामुळे चंद्रपुरातील अनेक वार्डात सध्या डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. गावात स्वच्छता असली की गावाचे सौंदर्य वाढते. गावात निटनेटकेपणा येतो. शिवाय गावाचे आरोग्यही सुदृढ असते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वच्छतेचा कानमंत्र दिला. मात्र चंद्रपूरसारख्या शहरात याला हरताळ फासला जात आहे. ठिकठिकाणी कचरा पडून असलेला दिसतो. परिणामी चंद्रपुरातही साथीचे आजार असेच फोफावत राहणार काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.