शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

साथीच्या आजाराला मनपाचे पाठबळ

By admin | Updated: November 13, 2014 22:58 IST

सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात

‘ती’ वाहनेही गायब : घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडलेरवी जवळे - चंद्रपूरसध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात असतानाही घाणीचा विळखा सुटू शकला नाही. मनपाने कचरा उचलण्याचे कंत्राट दिले, मात्र कचरा उचलला जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कंत्राट दिले. परंतु तेही सुरू होऊ शकले नाही. एकूणच घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. साथीच्या आजाराला मनपा जणू पाठबळच देत आहे, हे यावरून दिसून येते.मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक जणांना डेंग्यू, मलेरिया यासारख्या डासांपासून पसरविणाऱ्या आजाराने ग्रासले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी खासगी रुग्णालयात अनेक जण उपचार घेत आहेत. गावागावात, शहरात पसरलेली अस्वच्छताच याला कारणीभूत आहे, हेदेखील निर्विवाद सत्य आहे. असे असतानाही स्वच्छतेबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती उदासीन का, हे समजेणासे झाले आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृतीचा अभाव आहे. मात्र चंद्रपूरसारख्या शहरातही अशीच परिस्थिती राहावी, याचे आश्चर्य वाटते. शहराची स्वच्छता अबाधित रहावी व शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी महानगरपालिकेकडून लाखोंचा खर्च केला जात आहे. शहरातून दररोज कचरा उचलून तो डम्पींग यार्डमध्ये टाकण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंत्राट दिल्यानंतर काही महिन्यात या कंपनीने अटी व शर्थीनुसार नवीन कोरी वाहने आणली. प्रारंभी कचरा उचलण्याचे काम निट सुरू राहिले. मात्र कालांतराने गल्लीबोळात दिसणारी कचरा उचलणारी ही वाहने कमी होत गेली. मागील एक दोन महिन्यात कचरा उचलण्याच्या कामात चांगलीच अनियमिता आली आहे. सध्या तर अनेक वार्डात कचरा दोनदोन दिवस पडून असलेला दिसतो. कचरा उचललाही तरी तो नीट उचलला जात नाही. त्यामुळे चंद्रपुरातील अनेक वार्डात सध्या डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. गावात स्वच्छता असली की गावाचे सौंदर्य वाढते. गावात निटनेटकेपणा येतो. शिवाय गावाचे आरोग्यही सुदृढ असते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वच्छतेचा कानमंत्र दिला. मात्र चंद्रपूरसारख्या शहरात याला हरताळ फासला जात आहे. ठिकठिकाणी कचरा पडून असलेला दिसतो. परिणामी चंद्रपुरातही साथीचे आजार असेच फोफावत राहणार काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.