शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीत घातक घटकांचीच संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:55 IST

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील माती तपासणी अहवाल जाहीर झाला असून, शेतीला पूरक असणाºया सूक्ष्म मूलद्रव्यांचीच कमतरता आढळली. अनिष्ट घटकांची उणीव दूर करण्यास शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविणे आणि दरवर्षी मातीची (मृद) तपासणी करण्यास प्रोत्साहन देणे कृषी विभागासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी दरवर्षी माती परीक्षण करण्याची मोहीम केंद्र व राज्य ...

ठळक मुद्देमृद तपासणी अहवालातील नोंदी : सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील माती तपासणी अहवाल जाहीर झाला असून, शेतीला पूरक असणाºया सूक्ष्म मूलद्रव्यांचीच कमतरता आढळली. अनिष्ट घटकांची उणीव दूर करण्यास शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविणे आणि दरवर्षी मातीची (मृद) तपासणी करण्यास प्रोत्साहन देणे कृषी विभागासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी दरवर्षी माती परीक्षण करण्याची मोहीम केंद्र व राज्य शासनाने सुरू केली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दहा हजारांहून अधिक मातीचे नमुने तपासण्यात आले. जिरायती क्षेत्राच्या दहा हेक्टर क्षेत्रातून एक मृद नमुना तपासणीकरिता घेण्यात आला होता. या तपासणी अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म मूलद्रव्यांची कमरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, लोह व जस्त या दोन सूक्ष्म मूलद्रव्यांची कमरता आढळली. मातीतील ही कमतरता पिकांच्या उत्पादनवाढीसाठी मारक असल्याचे कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत माती नमुन्यांची तपासणी सुरू असून, दीड हजार आरोग्य पत्रिकेचे वाटप झाले आहे.मातीतील महत्त्वाचे घटकशेतीपूरक मातीत चार घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रीय पदार्थ, २५ टक्के पाणी तसेच २५ टक्के असल्याशिवाय शेतमालाचे उत्पादन होऊ शकत नाही. हे घटक संतुलित राहिल्यास पिकांची उत्पादकता वाढते. माती तपासणी न करता रासायनिक खतांचा वारेमाप केल्याने शेतीपूरक सूक्ष्म जीवांचे प्रमाण नष्ट होते. गांडुळासारखे विविध प्रकारचे कृमी मृत पावतात. त्यामुळे मृदा म्हणजे माती परीक्षण केले पाहिजे. परंतु, तपासणी करणाºया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमाण अद्याप वाढले नाही.आरोग्यपत्रिकेतून बोधामृतमृद तपासणी केल्यानंतर कृषी विभागाकडून शेतकºयांना आरोग्यपत्रिकेद्वारे उपाययोजना सूचविली जाते. या उपाययोजनांमध्ये जमिनीची पूर्वमशागत, आंतरमशागत, पिकांचे पेरपालट, शेणखत, गांडूळखत, जिवाणू खतांचा वापर आणि जल व मृदसंधारणीची कामे आदींचा समावेश असतो. अल्प व मध्यम भूधारक शेतकºयांची स्थिती लक्षात घेता हा आर्थिक बोझा पेलविणे शक्य होत नाही. अनेक योजना शेतकºयांपर्यंत पोहोचविले जात नाही. पण, आरोग्यपत्रिकेद्वारे बोधामृत पाजण्याचा प्रकार सुरूच आहे.असे आहेत मातीचे आजारमृद अहवालानूसार शेतीपूरक मातीची अल्कधर्मी कामू कमी झाला. सेंद्रीय कर्बाची कमरता आहे. सतत एकाच पीक पद्धतीचा अवलंब केल्याने पोत बिघडला. अन्न द्रव्यांचा ऱ्हास झाला. क्षारयुक्त चोपण जमिनीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष आणि जमिनीची धूप, आदी मृद आजारांमुळे कृषी उत्पादनाला फ टका बसत आहे.एक दृष्टिक्षेप...कृषी विभागाने राज्यातून १४ लाख ७४ हजार मातीचे नमुने तपासणीकरिता घेतल होते. त्यापैकी ६० हजार नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली. ६८ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, आतापर्यंत केवळ आठ लाख ८१ हजार शेतकऱ्यांनाच ही आरोग्यपत्रिका देण्यात आली आहे.