जिल्ह्यात बाधितांची संख्या ८८ हजार ६७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १०३ झाली आहे. सध्या २८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ८१ हजार ७७६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ९ हजार ५५७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५४० बाधितांचे मृत्यू झाले आहे.
नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.