शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

आता औषधांच्या चिठ्ठीवर शौचालयाची नोंद

By admin | Updated: February 8, 2015 23:33 IST

स्वच्छता मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. आता आरोग्य यंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,

माजरी: स्वच्छता मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. आता आरोग्य यंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कुटीर, वैद्यकीय केंद, संस्था, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, यासोबत नोंदणीकृत खासगी रुग्णालय, वैद्यकीय व्यावसायिक आणि निमशासकीय संस्था, कंपनीच्या रुग्णालयांना या मोहिमेत सहभागी करण्यात येणार आहे. त्यानुसार डॉक्टरांना आता औषधांचा चिठ्ठीवर रुग्णांच्या घरी किंवा कार्यालयात शौचालय आहे किंवा नाही, याबाबतची नोंद करावी लागणार आहे.प्रत्येक घरी शौचालय बांधण्यासाठी रुग्णांना प्रवृत्त करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. शौचालय नसल्यामुळे लोक उघड्यावर शौचास बसत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, पाणी व हवा दुषित होऊन अतिसार, कॉलरा, विषमज्वर, हगवण, कावीळ, कुपोषण, पोलीओ आणि रोटाव्हायरससारखे आजार होत आहेत. सरकारी, निमसरकारी, खासगी रुग्णालयांच्या मार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. आता तर वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही शौचालयाबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली असून आता रुग्णांना तपासल्यानंतर दिल्या जाणाऱ्या औषधांच्या चिठ्ठीवर शौचालय आहे किंवा नाही याबाबतची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ज्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसल्यास अशा लोकांना समुपदेशन करुन शौचालय बांधण्यास प्रवृत्त करावे. रुग्णास शौचालयाचे होणारे फायदे व शौचालय नसल्याने होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात स्वच्छतेचा जागर होत आहे. खासगी असो की सरकारी कर्मचारी प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व पटले आहे. मात्र ग्रामीण, दुर्गम, आदिवासी, झोपडपट्टी यासह इतरही अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने येथील घटकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. शासकीय आरोग्य विभाग आणि खासगी यंत्रणांच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्याचा व जनजागृतीचा प्रयत्नही सुरू आहे. (वार्ताहर)