शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

आता एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष

By admin | Updated: July 11, 2017 00:31 IST

सन २०१६ मध्ये एक कोटीचा संकल्प केला होता. एक कोटी ८२ लाख वृक्षाची लागवड करण्तात आली. यावर्षी चार कोटीचा संकल्प केला.

पालकमंत्र्यांनी मानले चंद्रपूरकरांचे आभार : नव्या आव्हानाला सिद्ध व्हाचंद्रपूर : सन २०१६ मध्ये एक कोटीचा संकल्प केला होता. एक कोटी ८२ लाख वृक्षाची लागवड करण्तात आली. यावर्षी चार कोटीचा संकल्प केला. पाच कोटी २१ लाखांची वृक्ष लागवड झाली. आता पुढील वर्षी १३ कोटी वृक्ष लावगडीसाठी सिध्द व्हा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्हा चार कोटी वृक्ष लागवडीत केवळ ६७ हजार वृक्ष लागवडीच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हावासीयांचे आभार मानले आहे.सोमवारी वनमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, वनाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपरिषदा- नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्याशीही संपर्क साधला. ४३ लाखांच्या वृक्षलागवडीबद्दल त्यांचे कौतुक केले. नाशिक जिल्ह्याने या वृक्ष लागवडीत ४४ लाख २ हजार ७०२ वृक्ष लावले आहे.राज्यात ७ जुलै रोजी सायंकाळपर्यंत ५ कोटी ४३ लाख ३५ हजार ४९ वृक्षांची लागवड करण्यात आली असून या संकल्पपूर्तीमध्ये अधिकारी-कर्मचारी, वनसंरक्षक आणि वनमजुरापासून राज्यातील सर्व जनता, स्वयंसेवी-सामाजिक संघटना, आध्यात्मिक संस्था आणि इतर मान्यवर पूर्ण उजेर्ने सहभागी झाले होते. या सर्वांचा मी आभारी आहे. आता प्रत्येक जिल्ह्याने यावर्षी लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाबरोबर पुढील वर्षीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यातील लॅण्ड बँकेची तयारी, उत्तम व दर्जेदार रोपांसाठी अत्याधुनिक रोपवाटिकांची निर्मिती आणि एक कोटी हरित सेनेसाठी स्वयंसेवकांची नोंदणी या चतु:सुत्रीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक अधिकाऱ्याने आठवड्यातून किमान दोन तास या संकल्पाच्या नियोजन आणि कृतीसाठी राखून ठेवावा. जिल्हापातळीवर यासाठी आवश्यक असणाऱ्या समित्यांची स्थापना करावी, वृक्ष लागवडीसाठी जमीन कुठे आणि कशी उपलब्ध होऊ शकेल, याचे नियोजन करून तिथे भविष्यात किती वृक्ष लागवड करता येऊ शकेल, याचा आराखडा तयार करावा.राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्मृती वन, वनौषधी वन विकसित केले जावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बांबू लागवड मिशनमोड स्वरूपात हाती घेण्यासाठी उत्तम बांबू नर्सरीत तयार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. जल, जमीन, जंगल आणि पशुधन दृष्टीसमोर ठेवून पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन करताना वृक्ष लागवड ही उपजीविकेशी संलग्न कशी होईल, यातून ग्रामीण अर्थव्यवस्था कशी विकसित होईल, हे ही पाहिले जावे, असे त्यांनी सांगितले. व चंद्रपुरकरांचे आभार व्यक्त केले. हरित महाराष्ट्र चळवळीला वेग- खारगेवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली हरित महाराष्ट्राच्या चळवळीला वेग आल्याचे वनसचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संगोपनाचा प्रत्येक जिल्ह्याने प्लॅन तयार करावा. पुढील वृक्ष लागवडीसाठी लॅन बँक निश्चित करावी, रोपवाटिकांमधून चांगली आणि दर्जेदार रोपे तयार होतील, यासाठी विशेष लक्ष द्यावे तसेच जिल्ह्यात हरित सेनेच्या नोंदणीला गती द्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.स्थानिक कार्यालयाचे शेळके यांनी केले कौतुकव्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु होण्यापूर्वी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी वृक्षलागवडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचे आभार मानले. सर्वांच्या सहभागाशिवास चंद्रपूर जिल्हा विक्रमी वृक्षलागवड करु शकला नसता. मात्र या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून सहभागी होऊन स्वत:चा सहभाग नोंदविणाऱ्या अन्य विभागाचे वनविभागाला कौतुक असून आपले नियमित काम करीत असतांना अनेकांनी झोकून देऊन काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.