शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आता प्लास्टिमुक्त चंद्रपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

मागील तीन वर्षात मनपाद्वारे स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. स्वच्छ भारत २०१९ स्पर्धेत मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहराने देशातून २९ वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे आपले शहर अग्रक्रमात येण्याची शक्यता आहे. मात्र या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. आपल्या घरासारखे शहर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता अजूनही रुजली नाहीये.

ठळक मुद्देमनपा प्रशासन गंभीरकारवाईसाठी पथके तयार१ मे रोजी करणार प्लास्टिकमुक्तची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत थोडेफार सुधारले आहे. चौकाचौकात घाणीचे साम्राज्य दिसत नाही. मात्र जोपर्यंत प्लास्टिकचा वापर होत राहणार, तोपर्यंत शहर स्वच्छ व स्मार्ट होणार नाही. त्यामुळे प्लास्टिकबाबत मनपा प्रशासन अतिशय गंभीर झाले आहे. सिंगल यूज प्लास्टिक शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. येत्या तीन महिन्यात चंद्रपूर शहर सिंगल यूज प्लास्टीकमुक्त शहर करण्यात येणार आहे. या संदर्भात मनपात बुधवारी तातडीची बैठक घेण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या दृष्टीने या बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली.या बैठकीला महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त संजय काकडे व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.मागील तीन वर्षात मनपाद्वारे स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. स्वच्छ भारत २०१९ स्पर्धेत मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहराने देशातून २९ वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे आपले शहर अग्रक्रमात येण्याची शक्यता आहे. मात्र या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. आपल्या घरासारखे शहर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता अजूनही रुजली नाहीये. रोज शहर स्वच्छ केल्यावरही प्लास्टिक पन्नी मोठया प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आता कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त संजय काकडे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक रवी आसवानी, देवानंद वाढई, उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त सचिन पाटील, शीतल वाकडे, धनंजय सरनाईक व मनपा अधिकारी उपस्थित होते.शासकीय अध्यादेशाला तिलांजलीशासकीय अध्यादेश २३ मार्च २०१८ नुसार एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तु उदा. ताट, वाटी चमचे, भांडी, कप ग्लास, स्ट्रॉ, हॉटेल्समधून अन्नपदार्थाच्या पॅकेजींगसाठी वापरले जाणारे लहान मोठे कंटेनर्स, प्लास्टिक बॅग्ज इत्यादीवर बंदी आहे. तरीही चंद्रपुरातील काही दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करताना दिसून येत असल्याने त्यांच्या विरोधात मनपाने जप्ती मोहीम सुरू केली आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने शहरातील विविध दुकानांवर, पानठेल्यांवर मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे.जनजागृतीचाही परिणाम नाहीमनपातर्फे सिंगल यूज प्लास्टिकबाबत बेटर चांदा मोहीम, क्रॉकरी बँक, शहरात विविध ठिकाणी तसेच जुन्या पुस्तक विक्रीच्या दुकानात जनजागृती बोर्ड, प्लॉग रन, सायकल रॅली, प्लास्टीकच्या मोबदल्यात मोफत बाह्य रुग्ण तपासणी, प्लास्टीक संकलन केंद्रे, कचऱ्यातून भेटवस्तू, स्वच्छता दिंडी, प्लास्टिक पन्नीचा वापर न करण्यासंबंधी पानटपरी चालकांकडून स्वयंघोषणापत्रावर स्वाक्षरी अशा विविध मोहिमांद्वारे जनजागृती केली मात्र यानंतरही पातळ प्लास्टिक पिशव्या, पन्नीचा वापर सुरूच आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी