शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

आता शेतकऱ्यांना तीन हजार रूपये पेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:09 IST

भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसते, अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान मानधन योजना। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना यापुढे तीन हजार रूपये मासिक पेंशन मिळणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसते, अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंतर्गत दरमहा तीन हजार रूपये निश्चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छीक व अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत भारतीय जीवन बीमा निमगव्दारे पेंशन फंडाव्दारे नोंदणीकृत पात्र शेतकºयांना पेंशन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वर्ष या वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकºयांना त्याचे १ ऑगस्ट २०१९ रोजीच्या वयानुसार ५५ ते २०० रूपये प्रतिमाह मासिक हप्ता वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पेंशन फंडमध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेंशन फंडमध्ये जमा केलेल्या मासिक हप्ताइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकºयांच्या पेंशन फंडमध्ये जमा करणार आहे.अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती-पत्नी स्वतंत्रपणे योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्रपणे तीन हजार रूपये मासिक पेंशन मिळणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या पात्र शेतकºयाला योजना बंद करायची असल्यास त्यांची जमा रक्कम व्याजासह परत मिळणार आहे.या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकºयांनी सेवानिवृत्ती तारखेपूर्वी आकस्मित निधन झाल्यास त्या व्यक्तीचे ६० वर्ष वयापर्यंतचे उर्वरित मासिक हप्ते पती-पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करून त्या व्यक्तीचे पेंशन खाते चालु ठेवू शकतात. सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधीन झालेल्याच्या वारसदारांना रक्कम मिळणार आहे.यांना मिळणार नाही योजनेचा लाभराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(ए.पी.एस.) कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनाझेशन स्किम,यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी, कामगार आणि रोजगार मंत्रालयाव्दारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन योजनातील पात्र शेतकरी, उच्च आर्थिक स्थितीत असलेले म्हणजेच प्रधानमंत्री किसान माधन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील, जमीन धरण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी केलेली व्यक्ती, माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे माहापौर व जि. प. अध्यक्ष, शासकीय कर्मचाºयांनी यांना लाभ मिळणार नाही.

टॅग्स :agricultureशेती