शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

आता जनावरांनाही विम्याचे संरक्षण

By admin | Updated: August 11, 2016 00:45 IST

आतापर्यंत मौल्यवान वस्तू तसेच व्यक्तींचा विमा काढता येणे शक्य होते.

शासनाची योजना : बळीराजाने संधीचा फायदा घेण्याचे आवाहनघोडपेठ : आतापर्यंत मौल्यवान वस्तू तसेच व्यक्तींचा विमा काढता येणे शक्य होते. मात्र आता, शासनाच्या पशुधन विमा योजनेद्वारे जनावरांचाही विमा काढणे शक्य झाले आहे.१ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या दरम्यान शासनातर्फे पशुधन विमा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. घोडपेठ येथेही पशुपालक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने पाळीव पशुंचा विमा उतरवत आहेत.शेतीसोबतच जोडधंदा करणे आवश्यक बनल्यामुळे बरेच शेतकरी दुग्धव्यवसायासाठी दुधाळू जनावरे पाळतात. मात्र, बरेचदा पावसाळ्यात रोगांची लागण झाल्यामुळे, अपघातामुळे, वीज पडल्यामुळे किंवा इतरही अनेक कारणांमुळे जनावरे दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र आता, शासनाच्या पशुधन विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे व इतरही पशुपालकांचे होणारे हे नुकसान टाळता येणार आहे.महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व दी न्यू इंडिया एश्योरेन्स कंपनी लि. यांच्या समन्वयाने असलेली पशुधन विमा योजना ही भारत सरकार व महाराष्ट्र शासन अनुदानित आहे. पॉलिसी कालावधीत पशुधनाचा मृत्यू हा आजारपण, अपघात, आग, वीज पडणे, पूर, वादळ, भूकंप, दुष्काळ व दंगलीमुळे झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे.पशुपालकाने विमा प्रस्ताव देताना प्रस्ताव पत्रासोबत शासकीय पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जनावरांचा मालक व बिल्ला असलेला फोटो तसेच विमा धारकांचा मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.विमा दाव्याच्या संदर्भात जनावरांचा मृत्यू झाल्यास तशी सूचना जनावराच्या मालकाने दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर २४ तासाच्या आत देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)घोडपेठ पशु वैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातील पंधरा गावांतील पशुंचा विमा काढणे सुरू आहे. पशुधन विमा पंधरवाडा अंतर्गत जास्तीतजास्त पशुपालकांनी तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पशुवैद्यकीय अधिकारी, घोडपेठ.