शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महाविद्यालयातच मिळणार आता वाहन चालविण्याचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:44 IST

वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा त्रास होणार कमी : मुंबई, नागपूर, चंद्रपूरमध्ये प्रथम राबविण्यात आला प्रयोग

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे. यापूर्वी मुंबई, कल्याण, नाशिक, चंद्रपूर, आणि नागपूर येथील परिवहन विभागाने हा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.स्पर्धेच्या युगात प्रत्येकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आली आहेत. शाळा, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीही यामध्ये मागे नाही. मात्र वाहन असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. परिणामी एखाद्यावेळी दुर्घटना झाल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात.पूर्वी परवान्यासाठी परिवहन कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर कार्यालयाने दिलेल्या दिवशी जाऊन संगणकीय चाचणी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. यामध्ये वेळ वाया जात होता. त्यामुळे परिवहन विभागाने वाहनचालकांना परवाना देण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्या दिवशी नंबर असेल त्या दिवशी कार्यालयात जाऊन संगणकीय चाचणी झाल्यानंतर लर्निंग लायसन्स देण्यात येत होते. मात्र यामध्येही अर्ज करणे, सांगितलेल्या दिनांकाला उपस्थित राहणे यामुळे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनसाठी त्रासदायक बनली होती. दरम्यान, दीड वर्षापूर्वी परिवहन विभागाने शिबिराच्या माध्यमातून परवाना वितरण करण्याचा कार्यक्रम आखला.यामध्ये प्रथमदर्शी मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर आणि चंद्रपूर या कार्यालयाने यशस्वीरित्या शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचा परवाना वितरित केला. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.त्यामुळे राज्यशासन तसेच परिवहन विभागाने आता राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये असे शिबिर आयोजित करून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देण्याची योजना आखली आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नसून वेळ आणि पैसाही वाचणार आहे.असे आयोजित होणार शिबिरपरिवहन अधिकारी प्रत्येक महाविद्यालयांना पत्र देऊन महाविद्यालयाची परवानगी घेणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येऊन एखादा दिवस ठरवून त्या दिवशी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये महाविद्यालयातील संगणकांचा वापर करण्यात येणार आहे. आता परिवहन विभागांकडे टॅब आले असून त्यामाध्यमातूनही शिबिरस्थळी परवाना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार फायदाअनेकवेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी जिल्हास्तरावर किंवा परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या तालुकास्तरावरील एखाद्यास्थळी जाऊन परवाना काढावा लागतो. यामध्ये त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता मात्र महाविद्यालयामध्येच लर्निंग लायसन्स परवाना मिळणार असल्याने त्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस