शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बोगस बियाणे देणाऱ्या चार कंपन्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. मात्र, ते बियाणेच उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा भुर्दंड बसला. एक नव्हे तर चक्क १३७ शेतकऱ्यांनी घेतलेले विविध कंपन्यांंचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या. त्या तक्रारींच्या आधारावर चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस बजावून त्यांच्याकडे बियाण्याबाबतची कागदपत्रे मागितली आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली. त्यात बियाणे कुठे तयार झाले, बियाणे तयार होताना कुणी बघितले, कोणाच्या निगराणीत बियाण्यांची पॅकिंग झाली, या संदर्भातील माहिती तसेच संपूर्ण कागदपत्रे मागितली आहेत. शेतकऱ्यांना जावे लागणार ग्राहक न्यायालयात- प्रयोगशाळेने बोगस बियाणे असल्याचा अहवाल दिल्यास त्या अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना कन्झुमर कोर्टात जावे लागेल. त्यानंतरच त्यांना बोगस कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळू शकते. त्या अहवालाच्या आधारावर कृषी विभाग संबंधितांवर कारवाई करेल. 

बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. संशयीत बियाणांचा नमुना घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. तसेच चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून घेतले आहेत. जर प्रयोगशाळेतील अहवालात बियाणे दोषपूर्ण आढळून आल्यास कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. -भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :agricultureशेती