शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बोगस बियाणे देणाऱ्या चार कंपन्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. मात्र, ते बियाणेच उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा भुर्दंड बसला. एक नव्हे तर चक्क १३७ शेतकऱ्यांनी घेतलेले विविध कंपन्यांंचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या. त्या तक्रारींच्या आधारावर चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस बजावून त्यांच्याकडे बियाण्याबाबतची कागदपत्रे मागितली आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली. त्यात बियाणे कुठे तयार झाले, बियाणे तयार होताना कुणी बघितले, कोणाच्या निगराणीत बियाण्यांची पॅकिंग झाली, या संदर्भातील माहिती तसेच संपूर्ण कागदपत्रे मागितली आहेत. शेतकऱ्यांना जावे लागणार ग्राहक न्यायालयात- प्रयोगशाळेने बोगस बियाणे असल्याचा अहवाल दिल्यास त्या अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना कन्झुमर कोर्टात जावे लागेल. त्यानंतरच त्यांना बोगस कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळू शकते. त्या अहवालाच्या आधारावर कृषी विभाग संबंधितांवर कारवाई करेल. 

बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. संशयीत बियाणांचा नमुना घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. तसेच चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून घेतले आहेत. जर प्रयोगशाळेतील अहवालात बियाणे दोषपूर्ण आढळून आल्यास कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. -भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :agricultureशेती