शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे देणाऱ्या चार कंपन्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. मात्र, ते बियाणेच उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा भुर्दंड बसला. एक नव्हे तर चक्क १३७ शेतकऱ्यांनी घेतलेले विविध कंपन्यांंचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या. त्या तक्रारींच्या आधारावर चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस बजावून त्यांच्याकडे बियाण्याबाबतची कागदपत्रे मागितली आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली. त्यात बियाणे कुठे तयार झाले, बियाणे तयार होताना कुणी बघितले, कोणाच्या निगराणीत बियाण्यांची पॅकिंग झाली, या संदर्भातील माहिती तसेच संपूर्ण कागदपत्रे मागितली आहेत. शेतकऱ्यांना जावे लागणार ग्राहक न्यायालयात- प्रयोगशाळेने बोगस बियाणे असल्याचा अहवाल दिल्यास त्या अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना कन्झुमर कोर्टात जावे लागेल. त्यानंतरच त्यांना बोगस कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळू शकते. त्या अहवालाच्या आधारावर कृषी विभाग संबंधितांवर कारवाई करेल. 

बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. संशयीत बियाणांचा नमुना घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. तसेच चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून घेतले आहेत. जर प्रयोगशाळेतील अहवालात बियाणे दोषपूर्ण आढळून आल्यास कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. -भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :agricultureशेती