शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

फायर आॅडिट नसलेल्या इमारतींना मनपाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:20 IST

व्यावसायिक इमारती, हॉटेल्स आदी इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने इमारतींच्या फायर आडिटकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. शहरातील सर्व इमारतींना याबाबत नोटीस बजावण्यात आली असून ज्या इमारत मालकांनी फायर आडिट करवून घेतले नाही, अशा इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

ठळक मुद्देप्रशासन गंभीर : अन्यथा वीज व पाणी पुरवठा खंडित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : व्यावसायिक इमारती, हॉटेल्स आदी इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने इमारतींच्या फायर आडिटकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. शहरातील सर्व इमारतींना याबाबत नोटीस बजावण्यात आली असून ज्या इमारत मालकांनी फायर आडिट करवून घेतले नाही, अशा इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.चंद्रपूर शहरात हजारो व्यवसायिक मालमत्ताधारक आहेत. याशिवाय सार्वजनिक व शसाकीय कार्यालयदेखील आहेत. या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिननियम २००६ अंतर्गत व्यावसायिक मालमत्ताधारकांनी त्यांच्या व्यावसायिक ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना पुरेशा प्रमाणात व वेळोवेळी प्रभावीरित्या कार्यक्षम आहे का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. याकरिता दर सहा महिन्यातून एकदा अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करून घेणे कायदेशरित्या बंधनकारक आहे. मात्र चंद्रपूर शहरातील बहुतांश व्यावसायिक मालमत्ताधारकांनी अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करून घेतलेले नाही. त्यामुळे याबाबत मनपाने आपल्या हद्दीतील सर्व व्यवसायिक मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे.शहरातील बऱ्याच व्यावसायिक मालमत्ताधारकांनी आपल्या व्यावसायिक ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा स्थापित केलेली नाही. त्यामुळे अशा इमारतधारकांनी लवकरात लवकर अग्निरोधक यंत्रणा बसवून घ्यावी. तसेच ज्या इमारतीनी सक्षमता प्रमाणपत्र घेतले नसेल, त्यांनी ते करून घ्यावे, अशा सूचना महानगरपालिकेने दिल्या आहेत. आग प्रतिबंध जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट, रूग्णालये, शैक्षणिक इमारत, बहुमजली शाळा व महाविद्यालय, व्यावसायिक इमारती, औद्योगिक इमारती, गोदामे तसेच १५ मीटरपेक्षा उंच रहिवासी इमारती व सर्व प्रकारच्या समीश्र वापराच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविणे आणि दरवर्षी त्याचे फायर आॅडीट करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविल्यानंतर दरवर्षी जानेवारी व जुलै अशा सहा महिन्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ती यंत्रणा कार्यक्षम असल्याचा दाखला घेणे बंधनकारक आहे.२८ फेब्रुवारीच्या आत ज्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसेल त्यांनी ती बसवून घ्यावी. तसेच ज्या इमारतींनी सक्षमता प्रमाणपत्र घेतले नसेल, त्यांनी ते करून घ्यावे. २८ फेब्रुवारीच्या आत कार्यवाही न केल्यास थेट सदरच्या इमारती वापरण्यायोग्य नसल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच महाराष्टÑ आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच कायद्यामध्ये नमुद असलेल्या इतर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने नोटीसमधून दिला आहे.व्यावसायिकांचे दुर्लक्षवर्षातून दोनदा फार्म बी व वार्षिक आॅडीट करणे बंधनकारक आहे. याबाबत व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास बाहेरून अग्निशमन यंत्रणा मदतीसाठी येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविता येत नाही. यात अनेकदा मोठे नुकसान होते. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत.