शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

चंद्रपुरातील १४९७ दुकानदारांना नोटीस

By admin | Updated: September 9, 2016 00:46 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या व मनपाच्या अखत्यारित असलेले दुकानगाळे अनेकांनी लिजवर घेतले.

मनपाची कारवाई : अवैधरीत्या दुकानांचे बांधकाम, लिजचे गाळे दुसऱ्यांना विकलेचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या व मनपाच्या अखत्यारित असलेले दुकानगाळे अनेकांनी लिजवर घेतले. मात्र या दुकानांमध्ये मनपाची कोणतीही परवानगी न घेता दुकानमालकांनी अतिरिक्त बांधकाम केले आहे. काहींनी तर लिजवर घेतलेल्या दुकानगाळ्यांची परस्पर विक्री केली आहे. ही बाब उघडकीस येताच मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत १४९७ दुकानमालकांना नोटीस बजावली आहे. महानगरपालिका अधिनियमांतर्गत जारी केलेल्या या नोटीसमधून येत्या सात दिवसात उत्तर मागितले असून समाधानकारक उत्तर नसल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.तत्कालीन नगरपालिकेद्वारे शहरातील गोलबाजार, आझाद बगिचाजवळ, सराई मार्केट आदी परिसरात व्यापारी संकूल तयार करण्यात आले होते. या संकुलातील दुकानगाळे लिजवर अनेक व्यावसायिकांना देण्यात आले आहे. नगरपालिकेच्या नियमानुसार तीन वर्षांपर्यत दुकानगाळे लिजवर देता येऊ शकते. त्यानंतर आमसभेच्या परवानगीने आणखी सहा वर्षांची लिज देता येऊ शकते. यापेक्षाही जास्त काळ दुकानगाळे लिजवर देताना राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र तत्कालीन चंद्रपूर नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने कधीच लक्ष दिले नाही आणि नियामाचे पालनही केले नाही. संबंधित दुकानमालकांनीही या संदर्भात कधी नियमांची माहिती जाणून घेतली नाही. आता महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर साडे चार वर्षांनी आयुक्त संजय काकडे यांनी याविषयीची इत्तंभुत माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना या गाळ्यांमध्ये अवैधरित्या बांधकाम झाल्याचे व काहींनी गाळेच विकून टाकल्याची बाब लक्षात आली. ही बाब गंभीर असल्याने व पुढे डोकेदुखीची ठरू शकणारी असल्याने आयुक्त काकडे या प्रकरणात कुठलाही भेदभाव न करता शहरातील १४९७ दुकानमालकांना नोटीस बजावली आहे व सात दिवसात उत्तर मागितले आहे. दरम्यान, एवढ्या वर्षानंतर अशा प्रकारची नोटीस मिळाल्यामुळे संबंधित दुकानमालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.या संदर्भात आयुक्त संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नोटीस बजावल्याची पुष्टी केली आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या दुकानमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांचे उत्तर आल्यानंतर जनसुनावणी घेतली जाईल. त्यानंतर कायदेशिर कारवाईसाठी योग्य पाऊल उचलले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ज्या दुकानमालकांनी लिजवर घेतलेले दुकानगाळे परस्पर विकले आहे, त्यांना रेडी रेकनरनुसार बाजारभावच्या ५० टक्के रक्कम मनपाकडे भरावी लागणार आहे. त्यानंतर लिजचे नुतनीकरण करावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना वर्तमान स्थितीत जे भाडे आकारले जात आहे, त्यानुसार भाडे अदा करावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)