शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील १४९७ दुकानदारांना नोटीस

By admin | Updated: September 9, 2016 00:46 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या व मनपाच्या अखत्यारित असलेले दुकानगाळे अनेकांनी लिजवर घेतले.

मनपाची कारवाई : अवैधरीत्या दुकानांचे बांधकाम, लिजचे गाळे दुसऱ्यांना विकलेचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या व मनपाच्या अखत्यारित असलेले दुकानगाळे अनेकांनी लिजवर घेतले. मात्र या दुकानांमध्ये मनपाची कोणतीही परवानगी न घेता दुकानमालकांनी अतिरिक्त बांधकाम केले आहे. काहींनी तर लिजवर घेतलेल्या दुकानगाळ्यांची परस्पर विक्री केली आहे. ही बाब उघडकीस येताच मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत १४९७ दुकानमालकांना नोटीस बजावली आहे. महानगरपालिका अधिनियमांतर्गत जारी केलेल्या या नोटीसमधून येत्या सात दिवसात उत्तर मागितले असून समाधानकारक उत्तर नसल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.तत्कालीन नगरपालिकेद्वारे शहरातील गोलबाजार, आझाद बगिचाजवळ, सराई मार्केट आदी परिसरात व्यापारी संकूल तयार करण्यात आले होते. या संकुलातील दुकानगाळे लिजवर अनेक व्यावसायिकांना देण्यात आले आहे. नगरपालिकेच्या नियमानुसार तीन वर्षांपर्यत दुकानगाळे लिजवर देता येऊ शकते. त्यानंतर आमसभेच्या परवानगीने आणखी सहा वर्षांची लिज देता येऊ शकते. यापेक्षाही जास्त काळ दुकानगाळे लिजवर देताना राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र तत्कालीन चंद्रपूर नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने कधीच लक्ष दिले नाही आणि नियामाचे पालनही केले नाही. संबंधित दुकानमालकांनीही या संदर्भात कधी नियमांची माहिती जाणून घेतली नाही. आता महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर साडे चार वर्षांनी आयुक्त संजय काकडे यांनी याविषयीची इत्तंभुत माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना या गाळ्यांमध्ये अवैधरित्या बांधकाम झाल्याचे व काहींनी गाळेच विकून टाकल्याची बाब लक्षात आली. ही बाब गंभीर असल्याने व पुढे डोकेदुखीची ठरू शकणारी असल्याने आयुक्त काकडे या प्रकरणात कुठलाही भेदभाव न करता शहरातील १४९७ दुकानमालकांना नोटीस बजावली आहे व सात दिवसात उत्तर मागितले आहे. दरम्यान, एवढ्या वर्षानंतर अशा प्रकारची नोटीस मिळाल्यामुळे संबंधित दुकानमालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.या संदर्भात आयुक्त संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नोटीस बजावल्याची पुष्टी केली आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या दुकानमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांचे उत्तर आल्यानंतर जनसुनावणी घेतली जाईल. त्यानंतर कायदेशिर कारवाईसाठी योग्य पाऊल उचलले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ज्या दुकानमालकांनी लिजवर घेतलेले दुकानगाळे परस्पर विकले आहे, त्यांना रेडी रेकनरनुसार बाजारभावच्या ५० टक्के रक्कम मनपाकडे भरावी लागणार आहे. त्यानंतर लिजचे नुतनीकरण करावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना वर्तमान स्थितीत जे भाडे आकारले जात आहे, त्यानुसार भाडे अदा करावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)