शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नोकरी नाही, सेवेसाठी निवड झाली

By admin | Updated: May 19, 2016 00:47 IST

इंग्रजी शिक्षणामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना अखेरची घरघर लागलेली आहे.

मुलाखत : युपीएससी परीक्षेतील बाजीगर नितीश पाथोडे म्हणतात...बाबुराव परसावार सिंदेवाहीइंग्रजी शिक्षणामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना अखेरची घरघर लागलेली आहे. अशातच एक सुखद बातमी कानावर आली. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या देशातील सर्वोच्च परीक्षेत विदर्भातील निवडक परीक्षार्थीमधून सिंदेवाहीचा नितीश हरिभाऊ पाथोडे यशस्वी झाला. त्यांच्याशी केलेली दिलखुलास बातचीत.नितीश पाथोडेला त्याच्या शिक्षणाविषयी विचारले असता, त्याने सांगितले, माझे इयत्ता चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सिंदेवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ (हेटी) येथे झाले. पाचवी ते दहावीपर्यंत सिंदेवाहीतील सर्वोदय विद्यालयात, ११ वी व १२ वी पर्यंतचे शिक्षण नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी आणि इलेक्ट्रानिक्स व टेलिकम्युनिकेशन मध्ये बी. टेक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणार जिल्हा रायगड येथून झाले, असे सांगितले.युपीएससी परीक्षेची निवड कशी केली, असे विचारला असता, भारतीय प्रशासनात जाण्याचा केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) हा एकमेव मार्ग आहे. माझे घरचे वातावरण शैक्षणिक आणि सामाजिक आहे. आई लीला व बाबा हरिभाऊ दोघेही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रीय कार्यकर्ते व बाबा विदर्भ संघटक आहेत. लहानपणापासून घरात चळवळ पाहिली. शिबिर, प्रशिक्षण, सभा, व्याख्याने नेहमीच होत असत. आपणही समाज कार्यात योगदान द्यावे, असे नेहमी वाटायचे. प्रशासकीय अधिकारी बनून जोमाने कार्य करता येईल असे वाटले आणि पदवीनंतर लगेच युपीएससीच्या तयारीला लागलो. या परीक्षेच्या तयारीबद्दल विचारले असता, अभ्यासाठी पुणे शहराची निवड केली. तेथील शैक्षणिक वातावरण चांगले आहे. मार्गदर्शनासाठी खासगी क्लॉसेस लावले. प्रा. तुकाराम जाधव आणि प्रा. अतुल लांडे यांची मला मदत झाली. ज्ञान प्रबोधिनीच्या अभ्यासिकेत प्रतिदिन १२ ते १४ तास अभ्यास करायचो. सन २०१२ पासून मी घरची दिवाळी पाहिली नाही. इतर अभ्यासातील सातत्य टिकविण्यासाठी मी आनंद व दु:खाच्या प्रसंगातही कधी सहभागी झालो नाही, असे सांगितले.परीक्षेसाठी कुटुंबाची मदत कशी झाली, याबाबत विचारले असता, ते म्हणाले माझ्या घरी आई, वडील व मोठी बहीण आहे. आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. उत्कृष्ट शिक्षक व शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी सन २०१२ ला माझ्या वडिलांना तत्कालीन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे हस्ते राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यात आम्ही सर्व सहभागी होतो. मी दररोज रात्री ८ ते ९ च्या दरम्यान आई-वडिलांशी फोनवर किमान अर्धातास चर्चा करीत असतो. ती चर्चा कौटुंबिक नसून देशातील चालू घडामोडीवर असते. मी मुख्य परीक्षेसाठी मुंबईला होतो. तेव्हा माझी बहीण नीलम व भाऊजी पंकज लोहकरे यांनी सहकार्य केले, असे सांगितले. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल, असे विचारले असता, विद्यार्थी ग्रामीण असो की शहरी. शाळा मराठी असो की इंग्रजी, परिश्रम महत्त्वाचे आहे. एखादे ध्येय उराशी बाळगा. कोणतेही काम जिद्दीने करा. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणारा विद्यार्थी आयएएस बनू शकतो, हे लक्षात ठेवा आणि तयारीला लागा, असे आवाहन केले.