शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

तीन पिढ्यांच्या शोधात गुंतले गैरआदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : ताब्यात असलेल्या वन जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी जबरानजोतधारकांनी अर्ज दिले. मात्र, तीन पिढ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी : ताब्यात असलेल्या वन जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी जबरानजोतधारकांनी अर्ज दिले. मात्र, तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याने अनेकांचे दावे नामंजूर करण्यात आले आहेत. तीन पिढ्यांचा रहिवासी दाखला आणायचा कुठून, या विवंचनेत जबरानजोतधारक शेतकरी आहेत.

ज्या जमिनीवरच जगणे-मरणे आहे, ती जमीन सोडावी लागणार या विचाराने अनेक कुटुंब हादरली आहेत. वन विभागाच्या पडीक जमिनीत घाम गाळून पूर्वजांनी जमीन सुपीक केली. ओसाड जमिनीत शेती फुलवली. ही जमीनच अनेक कुटुंबांचा जगण्याचा आधार ठरली आहे. आता मात्र आपल्या आजोबा, वडिलांनी मोठ्या कष्टाने कसलेली ही जमीन परत जाणार, ही चिंता जबरानजोतधारक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वन जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून शेकडो गैरआदिवासी जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केले होते. मात्र, सादर केलेल्या अर्जासोबत तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याने उपविभागीयस्तरीय वनहक्क समिती, गोंडपिपरी यांच्या दिनांक २८ जुलै २०१०च्या सभेत हे दावे नामंजूर करण्यात आले होते. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे ३१ मे २०१८ रोजी दावा मंजूर करण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला होता. जिल्हास्तरीय वनहक्क समितीने ९ जुलै २०१९ रोजी विनंती अर्ज सादर केलेल्या जबरानजोतधारकांना नोटीस पाठवून लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले. दिनांक ३१ जुलै २०१९ला समितीने लेखी जबाब नोंदवले. २१ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या सभेत गैरआदिवासी जबरानजोतधारकांनी तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याचे कारण पुढे करून अनेक दावे नामंजूर करण्यात आले. दावा नामंजूर झाल्याचे पत्र जबरानजोतधारक शेतकऱ्यांच्या घरी धडकले असून, या पत्रांनी शेतकऱ्यांची घालमेल वाढवली आहे.

पुरावा आणायचा कुठून ?

तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा शोधण्यासाठी जबरानजोतधारक शेतकरी शासकीय कार्यालये पालथी घालत आहेत. मात्र, पुरावा काही केल्या सापडेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेकडो जबरानजोतधारकांची जमीन संकटात सापडली आहे.

माझ्यासारख्या शेकडो कुटुंबांचा जगण्याचा आधार ही आजोबा, वडिलांनी उभी केलेली शेतजमीन आहे. ही जमीन गेल्यास शेकडो कुटुंब रस्तावर येतील. शासनाने याचा फेरविचार करावा व जमिनीचे दावे मंजूर करून उद्ध्वस्त होणारे संसार सावरावे.

- राजू बोरकर, जबरानजोतधारक शेतकरी, बेघर (धाबा).