शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्यांच्या शोधात गुंतले गैरआदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : ताब्यात असलेल्या वन जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी जबरानजोतधारकांनी अर्ज दिले. मात्र, तीन पिढ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी : ताब्यात असलेल्या वन जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी जबरानजोतधारकांनी अर्ज दिले. मात्र, तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याने अनेकांचे दावे नामंजूर करण्यात आले आहेत. तीन पिढ्यांचा रहिवासी दाखला आणायचा कुठून, या विवंचनेत जबरानजोतधारक शेतकरी आहेत.

ज्या जमिनीवरच जगणे-मरणे आहे, ती जमीन सोडावी लागणार या विचाराने अनेक कुटुंब हादरली आहेत. वन विभागाच्या पडीक जमिनीत घाम गाळून पूर्वजांनी जमीन सुपीक केली. ओसाड जमिनीत शेती फुलवली. ही जमीनच अनेक कुटुंबांचा जगण्याचा आधार ठरली आहे. आता मात्र आपल्या आजोबा, वडिलांनी मोठ्या कष्टाने कसलेली ही जमीन परत जाणार, ही चिंता जबरानजोतधारक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वन जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून शेकडो गैरआदिवासी जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केले होते. मात्र, सादर केलेल्या अर्जासोबत तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याने उपविभागीयस्तरीय वनहक्क समिती, गोंडपिपरी यांच्या दिनांक २८ जुलै २०१०च्या सभेत हे दावे नामंजूर करण्यात आले होते. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे ३१ मे २०१८ रोजी दावा मंजूर करण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला होता. जिल्हास्तरीय वनहक्क समितीने ९ जुलै २०१९ रोजी विनंती अर्ज सादर केलेल्या जबरानजोतधारकांना नोटीस पाठवून लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले. दिनांक ३१ जुलै २०१९ला समितीने लेखी जबाब नोंदवले. २१ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या सभेत गैरआदिवासी जबरानजोतधारकांनी तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा जोडला नसल्याचे कारण पुढे करून अनेक दावे नामंजूर करण्यात आले. दावा नामंजूर झाल्याचे पत्र जबरानजोतधारक शेतकऱ्यांच्या घरी धडकले असून, या पत्रांनी शेतकऱ्यांची घालमेल वाढवली आहे.

पुरावा आणायचा कुठून ?

तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा शोधण्यासाठी जबरानजोतधारक शेतकरी शासकीय कार्यालये पालथी घालत आहेत. मात्र, पुरावा काही केल्या सापडेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेकडो जबरानजोतधारकांची जमीन संकटात सापडली आहे.

माझ्यासारख्या शेकडो कुटुंबांचा जगण्याचा आधार ही आजोबा, वडिलांनी उभी केलेली शेतजमीन आहे. ही जमीन गेल्यास शेकडो कुटुंब रस्तावर येतील. शासनाने याचा फेरविचार करावा व जमिनीचे दावे मंजूर करून उद्ध्वस्त होणारे संसार सावरावे.

- राजू बोरकर, जबरानजोतधारक शेतकरी, बेघर (धाबा).