शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

संगणक परिचालकांचा आक्रोश रस्त्यावर

By admin | Updated: March 24, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत परिचालकांवर महाआॅनलाईन कंपनी अन्याय करीत आहे.

पालकमंत्र्यांचा निषेध : तीन महिन्यांपासून मानधनाविना सुरू आहे कामचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत परिचालकांवर महाआॅनलाईन कंपनी अन्याय करीत आहे. टार्गेटच्या नावाखाली कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधनही हडप करण्यात आले. जिल्ह्यातील ३०० ते ४०० परिचालकांना तीन महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक परिचालकांचा आक्रोश सोमवारी रस्त्यावर उतरला. परिचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रशासन व पालकमंत्र्यांचा जाहिर निषेध केला.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचे काम संगणकीकृत करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतींशी निगडित लहान-मोठी कामे संगणकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र परिचालकांना केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपये मानधन दिले जात आहे. पगारवाढ, कायम नियुक्ती द्या आणि महाआॅनलाईनचा करार रद्द करावा या मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने काही दिवसांपुर्वी संप केला होता. १२ नोव्हेंबर ते २२ जानेवारी २०१५ पर्यंत हा संतप चालला. यादरम्यान मुंबई येथे साखळी उपोषणही करण्यात आले. तेव्हा ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी महाआॅनलाईनचे कंत्राट रद्द करण्यासोबतच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र त्यानंतर संपात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने काढण्यात आले. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर त्यांना कामावरही घेण्यात आले. मात्र अजूनही २५ ते ३० परिचालकांना अजूनही कामावर घेण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून तीनशे ते चारशे संगणक परिचालकांचे मानधन रोखण्यात आले आहे. केवळ टार्गेटच्या नावाखाली मानधन हडप करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केला आहे. मानधनाबाबत वारंवार विचारणा केली, असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. ई- बँकिंग सुविधेअंतर्गत काम केलेल्या संगणक परिचालकांना कमिशन मिळाले नाही. कमीशन तत्काळ देण्यात यावे, शासकीय सेवेत सामावून घ्यावे, १२ हजार रुपये वेतन देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी आणि प्रवास भत्ता देण्यात यावा, थकीत मानधन अदा करावे, कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हा परिषदेत पोहोचला. संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र गेडाम, धनराज रामटेके, प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी) अधिकाऱ्यांची मनमानीग्रामपंचायतीच्या रेकॉर्डचे संगणकीकरण करण्यात आले आहे. मात्र संगणक परिचालकांना कामाव्यतीरिक्त विविध कामे अधिकाऱ्यांकडून सोपविली जात आहेत. मानधन कमी आणि काम जास्त अशी गत परिचालकांची झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.