शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

संगणक परिचालकांचा आक्रोश रस्त्यावर

By admin | Updated: March 24, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत परिचालकांवर महाआॅनलाईन कंपनी अन्याय करीत आहे.

पालकमंत्र्यांचा निषेध : तीन महिन्यांपासून मानधनाविना सुरू आहे कामचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत परिचालकांवर महाआॅनलाईन कंपनी अन्याय करीत आहे. टार्गेटच्या नावाखाली कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधनही हडप करण्यात आले. जिल्ह्यातील ३०० ते ४०० परिचालकांना तीन महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक परिचालकांचा आक्रोश सोमवारी रस्त्यावर उतरला. परिचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रशासन व पालकमंत्र्यांचा जाहिर निषेध केला.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचे काम संगणकीकृत करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतींशी निगडित लहान-मोठी कामे संगणकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र परिचालकांना केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपये मानधन दिले जात आहे. पगारवाढ, कायम नियुक्ती द्या आणि महाआॅनलाईनचा करार रद्द करावा या मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने काही दिवसांपुर्वी संप केला होता. १२ नोव्हेंबर ते २२ जानेवारी २०१५ पर्यंत हा संतप चालला. यादरम्यान मुंबई येथे साखळी उपोषणही करण्यात आले. तेव्हा ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी महाआॅनलाईनचे कंत्राट रद्द करण्यासोबतच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र त्यानंतर संपात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने काढण्यात आले. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर त्यांना कामावरही घेण्यात आले. मात्र अजूनही २५ ते ३० परिचालकांना अजूनही कामावर घेण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून तीनशे ते चारशे संगणक परिचालकांचे मानधन रोखण्यात आले आहे. केवळ टार्गेटच्या नावाखाली मानधन हडप करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केला आहे. मानधनाबाबत वारंवार विचारणा केली, असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. ई- बँकिंग सुविधेअंतर्गत काम केलेल्या संगणक परिचालकांना कमिशन मिळाले नाही. कमीशन तत्काळ देण्यात यावे, शासकीय सेवेत सामावून घ्यावे, १२ हजार रुपये वेतन देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी आणि प्रवास भत्ता देण्यात यावा, थकीत मानधन अदा करावे, कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हा परिषदेत पोहोचला. संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र गेडाम, धनराज रामटेके, प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी) अधिकाऱ्यांची मनमानीग्रामपंचायतीच्या रेकॉर्डचे संगणकीकरण करण्यात आले आहे. मात्र संगणक परिचालकांना कामाव्यतीरिक्त विविध कामे अधिकाऱ्यांकडून सोपविली जात आहेत. मानधन कमी आणि काम जास्त अशी गत परिचालकांची झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.