शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

‘काम नाही तर वेतन नाही’ निर्णयाने शिक्षक संकटात

By admin | Updated: July 20, 2016 00:43 IST

राज्यातील खाजगी आश्रम शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना त्यांचे समायोजन होईपर्यंत वेतन थांबविणारा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

मुंबई येथे मोर्चा काढला : शेकडो कर्मचाऱ्यांचा होता सहभागजिवती : राज्यातील खाजगी आश्रम शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना त्यांचे समायोजन होईपर्यंत वेतन थांबविणारा आदेश राज्य सरकारने काढला आहे. या निर्णयाने शिक्षकांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. या विरोधात विमुक्त जाती भटक्या जमातीच्या राज्यभरातील आश्रमशाळा शिक्षक संघटनेने सोमवारी मुंबई येथे राज्यव्यापी आंदोलन केले.१ एप्रिल २०१६ ला काम नाही तर वेतन नाही या तत्वावर आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय शासनाने घेतला. एवढेच नाही तर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंतचा त्या अतिरिक्त शिक्षकाचा खाली दिवसाचे वेतन थकबाकीसुद्धा देण्यात येणार नाही.आश्रम शाळामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे पगार या अगोदरच थकित होते. परत या निर्णयाचा परिणाम म्हणून सर्वच शिक्षण संस्थामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचे कुटूंब आर्थिक विवंचनेत सापडणार आहेत.सामाजिक न्याय विभाग तसेच अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांसाठी १ एप्रिल २०१६ ला काम नाही तर वेतन नाही हा निर्णय घेण्यात आल्याने याविरोधात कर्मचाऱ्यात तिव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. जर असे झाल्यास अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे भविष्य धोक्यात येणार आहे. एकीकडे अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समायोजन करणे तर दुसरीकडे त्याचा खालीे दिवसाचे वेतनही न देणे आणि १ एप्रिलचा हा शासन निर्णय यात कर्मचारी गुरफटला आहे. एकंदरीत या घर का ना घाट का अशी स्थिती झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्यभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)काम नाही तर वेतन नाही हा शासनाचा निर्णय अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या कुटूंबासाठी धोक्याची घंटा आहे. ते आर्थिक विवंचनेत सापडणार आहेत. समायोजन होईस्तोवर खाली दिवसाचे वेतनही न देणे म्हणजे त्या कर्मचाऱ्याला उपाशी मारण्याचे धोरण शासन राबवित आहे. एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाचा त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन शासनाने हा निर्णय रद्द करावा, हीच अपेक्षा.- एम. बी. पिंपळकर, अध्यक्षआश्रमशाळा कर्मचारी संघ, शाखा मुंबई