शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगचा पत्ता नाही, हातगाड्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: December 23, 2014 23:01 IST

भौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते.

आशिष देरकर - गडचांदूरभौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते. अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे संपूर्ण रस्ते व्यापलेले आहेत. त्यामुळे दररोज नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गडचांदूर शहराची रचना मुळात चुकीच्या पद्धतीने झाल्याने शहरात दोन मुख्य रस्ते आहेत. या दोन्ही मुख्य रस्त्यांच्या दोन्ही कडेला व्यापारी बाजारपेठ आहेत. केवळ १५ फुटाचे दोन्ही रस्ते असल्यामुळे ग्राहकांना स्वत:चे वाहन उभे करण्याकरीता जागा उपलब्ध राहत नाही. अशावेळी ग्राहक रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. येथेच हातगाड्याही उभ्या केल्या जातात. त्याचा त्रास वर्दळ करणाऱ्या वाहनधारकांना होतो. या मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेने एकाचवेळी दुसरे चारचाकी वाहन आल्यास अनेकदा वाहतूक ठप्प होते. अशावेळी दुचाकी चालक कित्येकदा हॉर्न वाजवून मिळेल त्या गल्लीतून निघून जातात.गडचांदूर सिमेंंट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, मुरली अ‍ॅग्रो व अंबुजा असे चार सिमेंंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्त्व वाढविण्यात कारखान्यांचा मोठा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक येथे रोजगारासाठी वास्तव्यास असल्यामुळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सिमेंटची वाहतूक करण्याकरीता गडचांदूर शहरात अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. कोणत्याही ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपले ट्रक उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते. ज्या रस्त्यावर हे वाहन उभे असतात, तो सुद्धा गडचांदूर शहरात प्रवेश करण्याच्या मुख्य मार्ग आहे. रस्त्यावरील वाहनांनामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अवैध पार्किंगवर आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची पोलिसांमध्ये इच्छाशक्ती नसल्यामुळे ट्रान्सपोर्टवाल्यांची दादागिरी नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात. याच मार्गावरुन शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या ट्रकांमुळे या ठिकाणी अनेक अपघात पण घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यंत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नगरपरिषद व पोलिसांनी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्विकारुन अवैध पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण दूर होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.