शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पार्किंगचा पत्ता नाही, हातगाड्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: December 23, 2014 23:01 IST

भौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते.

आशिष देरकर - गडचांदूरभौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते. अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे संपूर्ण रस्ते व्यापलेले आहेत. त्यामुळे दररोज नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गडचांदूर शहराची रचना मुळात चुकीच्या पद्धतीने झाल्याने शहरात दोन मुख्य रस्ते आहेत. या दोन्ही मुख्य रस्त्यांच्या दोन्ही कडेला व्यापारी बाजारपेठ आहेत. केवळ १५ फुटाचे दोन्ही रस्ते असल्यामुळे ग्राहकांना स्वत:चे वाहन उभे करण्याकरीता जागा उपलब्ध राहत नाही. अशावेळी ग्राहक रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. येथेच हातगाड्याही उभ्या केल्या जातात. त्याचा त्रास वर्दळ करणाऱ्या वाहनधारकांना होतो. या मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेने एकाचवेळी दुसरे चारचाकी वाहन आल्यास अनेकदा वाहतूक ठप्प होते. अशावेळी दुचाकी चालक कित्येकदा हॉर्न वाजवून मिळेल त्या गल्लीतून निघून जातात.गडचांदूर सिमेंंट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, मुरली अ‍ॅग्रो व अंबुजा असे चार सिमेंंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्त्व वाढविण्यात कारखान्यांचा मोठा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक येथे रोजगारासाठी वास्तव्यास असल्यामुळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सिमेंटची वाहतूक करण्याकरीता गडचांदूर शहरात अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. कोणत्याही ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपले ट्रक उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते. ज्या रस्त्यावर हे वाहन उभे असतात, तो सुद्धा गडचांदूर शहरात प्रवेश करण्याच्या मुख्य मार्ग आहे. रस्त्यावरील वाहनांनामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अवैध पार्किंगवर आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची पोलिसांमध्ये इच्छाशक्ती नसल्यामुळे ट्रान्सपोर्टवाल्यांची दादागिरी नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात. याच मार्गावरुन शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या ट्रकांमुळे या ठिकाणी अनेक अपघात पण घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यंत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नगरपरिषद व पोलिसांनी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्विकारुन अवैध पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण दूर होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.