शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ११८३ हेक्टरवर ना नवा उद्योग ना वीज प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST

भद्रावती : उद्योगामुळे त्या क्षेत्राच्या विकासासोबतच रोजगाराच्या नव्या संधी चालून येतात. आपल्या मुलांना रोजगार मिळेल, या आशेने शेतकरीही आपली ...

भद्रावती : उद्योगामुळे त्या क्षेत्राच्या विकासासोबतच रोजगाराच्या नव्या संधी चालून येतात. आपल्या मुलांना रोजगार मिळेल, या आशेने शेतकरीही आपली उपजीविका करणारी जमीन अल्पदरात प्रकल्पांना देते. मात्र त्या ठिकाणी प्रस्तावित उद्योग उभा झाला नाही, तर घोर निराशा होते, अशीच अवस्था भद्रावती येथे निप्पान डेंड्रोसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे. प्रकल्प तर झालाच नाही. कवडीमोल भावात शेती गेल्याने भूमिहीन होण्याची पाळी आली.

निप्पान डेंड्रो वीज प्रकल्पासाठी २६ वर्षांपूर्वी ११८३.२३ हेक्टर इतकी लाखमोलाची शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली. या प्रकल्पासाठी मोठ्या आशेने भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुणाला टोला, चारगाव विजासन, लोणार रीठ, चिरादेवी या गावातील ६६८ शेतकऱ्यांची ही शेतजमीन आहे. १९९४-९५ मध्ये वीज प्रकल्पासाठी ही जमीन संपादित करण्यात आली. उपरोक्त संपादित क्षेत्र निप्पॉन डेन्ड्रोच्या नावाने आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात ही जमीन आहे.

बाॅक्स

तत्कालीन पंतप्रधानांनी केले होते भूमिपूजन

संपादित क्षेत्राची अंदाजे लांबी ३५०० मीटर व रुंदी १५०० मीटर आहे. हे क्षेत्र भद्रावती शहरापासून सात कि. मी. अंतरावर आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्याहस्ते झाले होते. या ठिकाणी मोठा प्रकल्प व्हावा, यासाठी खासदार बाळू धानोरकर व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती.

जमीन पडीक ठेवण्यापेक्षा शेतकऱ्यांना परत द्यावी

गेल्या २६ वर्षांपासून या जागेवर कोणताही प्रकल्प झालेला नाही. शेतकऱ्यांनी ही जमीन कसली असती, तर त्यांची प्रगती झाली असती. एखादी जागा अधिग्रहित केल्यानंतर त्या ठिकाणी नियोजित प्रकल्प उभा झाला नाही, तर ती जमीन शेतकऱ्यांना परत द्यायला हवी. मात्र शेतकऱ्यांना जमीन तर परत मि‌ळाली नाही आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदलाही दिला गेला नाही. यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. प्रकल्पच होणार नसेल, तर ही जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, असा सूर उमटत आहे.