शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

२० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करु नये

By admin | Updated: March 8, 2016 00:48 IST

२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेंशन योजना लागू ठेवावी, ...

शिक्षकांच्या पाच प्रलंबित समस्या : पुरोगामी समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीचंद्रपूर : २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेंशन योजना लागू ठेवावी, आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तर रोस्टर तयार करुन आंतर जिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, म.प.पा. शाळांमधील शिक्षकांचे १०० टक्के अनुदान हे स्वतंत्र शिक्षक वेतन असे खास लेखाशिर्ष टाकून अनुदान मिळावे, सन २०१५-१६ च्या आॅनलाईन संचमान्यतेतील त्रुटी दूर करून समायोजन प्रक्रिया तत्काळ सुरू करावीे या पाच प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्यावतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना उपजिल्हाधिकारी अजय रामटेके यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले.एकीकडे वस्ती तिथे शाळा असे विधायक धोरण असताना आता २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा शासन बंद करीत आहे. यामुळे दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात. बालकांच्या व पालकांच्या संमतीशिवाय अशा शाळा शासनाला बंद करता येणार नाही. सदर शाळांचा खर्च शासनास परवडत नसेल तर अशा शाळांसाठी १० पटापर्यंत १ नियमित शिक्षक व ११ ते २० पटापर्यंत २ नियमित शिक्षक मंजूर करावे, अशी मागणी समितीने केली आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या राज्यकर्मचाऱ्यांशी सापत्न वागणूक करत शासनाने त्यांना पेंशनपासून वंचित ठेवले आहे. समान काम समान वेतन असे धोरण असतानाही धोरणाला फाटा देवून मनुष्यबळ विकासात अडचण आणल्या जात आहे. त्यामुळे सर्वांना जुनीच पेंशन योजना लागू असावी व यासह जुनीच सर्वसाधारण भविष्य निर्वाह योजनाही लागू करावी.आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतिक्षारत शिक्षकांचा तर शासन अंतच पाहत आहे. याचा परिणाम साहजिकन त्यांच्या कार्यक्षमतेवर दिसून येत आहे. विनाकारण तांत्रिक अडचणी निर्माण करून शिक्षण विभाग त्यांच्यावर मोठा अन्याय करीत आहे. जिल्हा रोस्टरच्या अटीतून सूट देत बदलीपात्र सर्व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय रोस्टर तयार करण्यात यावे व तत्काळ बदली प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे.मागील तीन वर्षांपासून शिक्षण विभागाची संचमान्यता रखडली आहे. त्यामुळे बदल्या, पदोन्नती, समायोजन, पदस्थापना पूर्णपणे बंद आहे. परिणामस्वरुप शिक्षक मानसिक मनस्ताप सहन करीत आहे. सन २०१३ पासून प्रलंबित असलेली संचमान्यता आजस्थितीला त्याच निकषावर मंजूर करणे अन्यायकारक होईल करीता जुनी सर्व प्रक्रिया रद्द करुन व सन २०१५-१६ च्या आॅनलाईन संचमान्यतेतील त्रुटी दूर करून रखडलेले समायोजन व अन्य समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात. या प्रमुख पाच मागण्यांसाठी पुरोगामी संघटनेच्यावतीने शनिवारीला ५ मार्चला राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व सरचिटणीस विजय भोगेकर यांच्या नेतृत्त्वात राज्यभर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदने देण्यात आली. निवेदनाच्या प्रति प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.चंद्रपूर येथील निवेदकांचे नेतृत्त्व दीपक वऱ्हेकर, हरिश ससनकर यांनी केले. यावेळी पुरोगामीचे जिल्हाभरातील पदाधिकारी दिलीप इटनकर, चंदा खांडरे, सुनीता इटनकर, प्रतिभा उदापुरे, दुष्यंत मत्ते, निखिल तांबोळी, बाळू गुंडमवार, सुधाकर कन्नाके, गजानन चिंचोलकर, देवराव दिवसे, विलास मोरे, रामकृष्ण चिडे, रवी बुरांडे, शंकर सोरते, गणेश दुधलकर, मनोज बुटले, श्रावण गुंडेटीवार, सिद्धम मौली, शंकरय्या हे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)