शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

ना ग्रामपंचायत राहिली, ना नगरपंचायत झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणे व निवडणूक रद्द करणे पडले महागात भिसी : जानेवारी २०२१मध्ये भिसी ग्रामपंचायत निवडणूक लागली ...

निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणे व निवडणूक रद्द करणे पडले महागात

भिसी : जानेवारी २०२१मध्ये भिसी ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर भिसी नगरपंचायत होणार असल्याची पहिली अधिसूचना शासनाने काढली. त्यामुळे एकदा ग्रामपंचायत व काही महिन्यातच नगरपंचायत निवडणूक लढावी लागेल, त्यापेक्षा सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन थेट नगरपंचायत निवडणूक लढवायची, असा सर्व गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. एकूण ६७ पैकी ६६ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. निवडणूक रद्द झाली. भिसी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र सहा महिने लोटले तरी भिसी नगरपंचायत होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता स्थानिक सर्व राजकीय गट व जनताही हैराण झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज उचलल्याचा उमेदवारांना आता पश्चाताप होत आहे.

आपापल्या वाॅर्डातील परिचित लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावातील जनता हक्काने आपापल्या समस्या सोडवायची. पण आता ही सोयच उरली नाही. १७ सदस्य असलेल्या भिसी ग्रामपंचायतीवर आता किती काळ प्रशासकाची सत्ता राहील, हा प्रश्न नेते व उमेदवारी अर्ज उचलणाऱ्यांना सतावत आहे. अरविंद रेवतकर गट, धनराज मुंगले गट, किशोर मुंगले गट, वंचित आघाडी गट, अनेक अपक्ष उमेदवार यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.

आपण फॉर्म उचलले नसते तर गावावर ही पाळीच आली नसती, असे मत व्यक्त करताना तत्कालीन उमेदवार दिसतात. प्रशासक व प्रभारी ग्रामसचिव या दोघांच्या खांद्यावर भिसीसारख्या सतरा ते अठरा हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावाचा भार आहे. दोन अधिकाऱ्यांना कामाच्या मर्यादा आहेतच. त्यामुळे लोकांचे वेळेत प्रश्न सोडविणे व विकासही करणे यालाही मर्यादा पडतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करण्यात आले. नगरपंचायतीची सगळी प्रक्रिया थांबली. आता या प्रक्रियेला वेग देण्यात यावा, लवकरात लवकर भिसी नगरपंचायतीची निर्मिती करून निवडणूक घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नगरपंचायत निर्मितीची प्रक्रिया थांबली होती. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत नगरपंचायत निर्मितीचा कार्यक्रम निघू शकतो. त्यानंतर प्रभागनिर्मिती, मतदारयाद्या, परिसिमन इत्यादी कामे होतील. नगरपंचायत निर्मितीला वेळ लागेल, नेमका किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. आता प्रशासकांमार्फतच गावाचा कारभार चालेल.

-संजय नागटिळक,

तहसीलदार, चिमूर.