शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

शासनाची भागीदारी जमा होईपर्यंत पीक विमा नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:30 IST

घनश्याम नवघडे नागभीड : पीक विमा कंपन्यांनी नागभीड तालुक्यासाठी पीक विम्यापोटी एक कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये ...

घनश्याम नवघडे

नागभीड : पीक विमा कंपन्यांनी नागभीड तालुक्यासाठी पीक विम्यापोटी एक कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये जून महिन्यातच मंजूर केले आहेत. मात्र, पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. जोपर्यंत शासन आपली भागीदारी विमा कंपन्यांकडे जमा करीत नाही, तोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे.

नागभीड तालुक्यात आठ हजार ५८८ शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी आहेत. आणि हेक्टरी एक हजार १७६ रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. मागील वर्षीच्या हंगामात अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत केले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्यांच्या आत होती. म्हणूनच शेतकऱ्यांकडून पीक विम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर दबाव वाढल्यांनतर विमा कंपन्यांनी ही मागणी मान्य करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याइतकी का होईना,पण पीक विमा देण्याचे जाहीर करून जून महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करून तालुक्यातील ८ हजार ५८८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये मंजूर केले. एवढेच नाही तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या तशा याद्याही संबंधित कृषी कार्यालयांना रवाना करण्यात आल्या.

दरम्यान, काही जाणकार शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून या वेळकाढूपणाबद्दल विचारणा केली. तालुका कृषी कार्यालयाने यासंदर्भात संबंधित विमा कंपनीकडे चौकशी केली असता आम्ही शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम देण्यास तयार आहोत. पण शासनाकडून भागीदारीची रक्कम प्राप्त झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम टाकण्यास अडचण येत असल्याची माहिती या पीक विमा कंपनीकडून तालुका कृषी कार्यालयास देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. हा संदर्भ घेऊन प्रस्तुत प्रतिनिधीने येथील तालुका कृषी कार्यालयास विचारणा केली असता या कार्यालयाकडून या बाबीस दुजोरा देण्यात आला.

बॉक्स

तीन महिने लोटले; मात्र विम्याचे पैसे मिळाले नाहीत

या बाबीस आता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी होत असला तरी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली नाही. यामुळे शेतकरी वर्गात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. सध्या पिकाच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना एक एक रुपयाची गरज आहे. पैशांअभावी शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक विमा कंपन्यांना नाही.