शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

स्मशानभूमी नाही गावाला, गाव नुसते नावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST

प्रकाश पाटील मासळ बु. : देश लवकरच स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना चिमूर तालुक्यातील नंदारा गावात अजूनही ...

प्रकाश पाटील

मासळ बु. : देश लवकरच स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना चिमूर तालुक्यातील नंदारा गावात अजूनही हक्काच्या अंत्यसंस्कारांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने मिळेल त्या जागेवर किंवा गावालगतच्या नाल्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे. मृतदेहांची अवहेलनाच होत आहे. मासळ परिसरातील नंदारा गावसुद्धा अग्रशिल आहे. त्यामुळे स्मशानभूमी नाही गावाला, गाव नुसते नावाला, असे म्हणण्याची वेळ नंदारा गावावर आली आहे.

मासळ परिसरातील नंदारा गावात गट ग्रामपंचात असून, या गावची लोकसंख्या हजार ते दीड हजार असून, या गावात वर्ग १ ते ४ पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. एकेकाळी याच गावात बैलाचा शंकरपट व्हायचा. तसेच सावकाराच्या नंदारा म्हणून नावाने या गावाची ओळख या परिसरात आहे. राजकीयदृष्ट्या गाव दुर्लक्षित असूनसुद्धा याच गावातील जिल्हा परिषद सदस्य ॲड. नवयुवक कामडी हे २० वर्षांपूर्वी निवडणुकीत विजयी झाले. परंतु सदर गावामध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनसुद्धा उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

आजतागायत गावकऱ्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. हक्काची स्मशानभूमी मिळालीच नाही. नंदारा गावालगत स्मशानभूमीसाठी सरकारी जागा उपलब्ध नसून, अंत्यविधीसाठी खासगी जागेचा वापर करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बॉक्स

स्मशानभूमी नसल्याने कुठेही अंत्यसंस्कार

स्मशानभूमी नसल्याने गावालगत खासगी जागेत, रस्त्यालगत उघड्यावर खाली जागेत किंवा उन्हाळ्यात गावालगत नाल्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. नंदारा गावामध्ये एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाला तर गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी अनेक मृतदेहांची हेळसांड होत आहे.

260721\img-20210724-wa0130.jpg

नंदारा ग्रामपंचायत समोरील हीच स्मशानभूमीसाठी प्रस्तावित खाली जागा