शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २८० अंगणवाड्यांना नाही हक्काची इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST

चंद्रपूर : प्राथमिक शाळेचा प्रथम पाया म्हणून अंगणवाडी केंद्राकडे बघितले जाते. मात्र जिल्ह्यातील तब्बल २८० अंगणवाडी केंद्रांना इमारतच नसल्याचा ...

चंद्रपूर : प्राथमिक शाळेचा प्रथम पाया म्हणून अंगणवाडी केंद्राकडे बघितले जाते. मात्र जिल्ह्यातील तब्बल २८० अंगणवाडी केंद्रांना इमारतच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे अद्यापपर्यंत अंगणवाडी केंद्र सुरू झाले नाही. मात्र मागील वर्षापर्यंत या अंगणवाडीतील चिमुकल्यांना समाजभवन, ग्रामपंचायत तसेच मिळेल त्या जागेत बसून ज्ञानार्जन करावे लागले.

औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कोळसा खाणी, लोखंड, सिमेंट एवढेच नाही तर ताडोबासारखा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात आहे. त्यामुळे देशातीलच नाही तर विदेशातीलही नागरिक चंद्रपूरला अधिक पसंती देतात. मात्र आजही काही गोष्टींमध्ये जिल्ह्याची पाहिजे तशी प्रगती झालीच नसल्याचे वास्तव आहे. अशीच स्थिती अंगणवाडी केंद्राचीही आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६८४ अंगणवाडी केंद्र आहेत. यामध्ये २ हजार ५६५ अंगणवाडी तर ११९ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. मात्र यातील तब्बल २८० अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारतच नाही. यामध्ये २११ मोठ्या तर ६९ मिनी अंगणवाड्यांना इमारत नाही. त्यामुळे काही ठिकाणी भाड्याच्या जागेत तर काही ग्रामपंचायत, विविध समाजमंदिरामध्ये मागील वर्षापर्यंत अंगणवाडी भरविली जात होती. यावर्षी कोरोना संकटामुळे अद्यापपर्यंत अंगणवाडी सुरू झाली नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर पुन्हा या चिमुकल्यांना अंगणवाडीच्या हक्काच्या इमारतीपासून वंचित राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ५५० अंगणवाडी केंद्राला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले असून, येथील बालकांना सर्वसुविधा पुरविल्या जात आहेत.

बाॅक्स

एकूण अंगणवाडी

२,६८४

इमारत असलेल्या

२,४०४

इमारत नसलेल्या २८०

बाॅक्स

जागा मिळेल तिथे आधार

कोरोना संकटामुळे यावर्षी अद्यापही अंगणवाडी सुरू झाल्या नाही. मात्र मागील वर्षीपर्यंत ज्या अंगणवाडी केंद्रांना इमारत नाही तसेच भाड्याची जागाही मिळत नाही, त्या गावातील अंगणवाडी जागा मिळेल तिथे भरवून चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे दिले जात होते. त्यामुळे किमान आतातरी या अंगणवाडीच्या इमारती तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---

जिल्ह्यात ५५० आयएसओ अंगणवाड्या

जिल्ह्यातील २८० अंगणवाडी केंद्रात इमारत तसेच इतर सुविधा नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ५५० अंगणवाडी केंद्रांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. या अंगणवाडी केंद्रामध्ये खेळणी, पाणी, परसबाग, बोलक्या भिंती, प्रथमोपचार केंद्र, चप्पल स्टॅन्ड, किचन आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.