शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांपासून रेती तस्करांवर कारवाईच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:33 IST

बल्लारपूर : तालुक्यात चार महिन्यांपासून भरपूर पाऊस पडल्यामुळे नदी, नाल्यात रेतीचा भरपूर साठा जमा झाला आहे. याचा फायदा घेत ...

बल्लारपूर : तालुक्यात चार महिन्यांपासून भरपूर पाऊस पडल्यामुळे नदी, नाल्यात रेतीचा भरपूर साठा जमा झाला आहे. याचा फायदा घेत रेती तस्कर दिवसरात्र रेती खनन करीत आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. हे सर्व तहसील प्रशासन उघड्या डोळ्यांनी आठ महिन्यांपासून पाहत आहे. रेती तस्करांचा एकही ट्रॅक्टर जप्त करण्यात आला नाही. या रेती तस्करांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव देवतळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

मागील तीन वर्षांपासून रेतीघाटाचे लिलाव होत नाहीत. लिलावाच्या आधीच रेती तस्कर रेतीची चोरी करून घाट खाली करतात. यामुळे कोणीच रेतीघाट घेत नाही. बल्लारपूर तालुक्यात पळसगाव येथे दोन, बामणी, दुधोली, कोर्टी मक्ता, मोहाडी तुकूम असे पाच रेतीघाट आहेत. याशिवाय कळमना, कोठारी येथील नाल्यातून दिवसरात्र रेती तस्कर ट्रॅक्टरने रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. या कामाला तालुक्यातील १०० ट्रॅक्टर अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत आहे, असेही निवेदनात तालुकाध्यक्ष महादेव देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश सोमाणी, आरिफ शेख यांनी म्हटले आहे.

140921\img-20210914-wa0192.jpg

उपविभागीय अधिकारी डॉ.दीप्ती सुर्यवंशी यांना निवेदन देताना कार्यकर्ते