शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय उपक्रमात चंद्रपूर राज्यात नवव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय स्टुडन्स व्हाॅटॲपर बेस्ट ...

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय स्टुडन्स व्हाॅटॲपर बेस्ट डिजिटल होम असाईमेंट योजना सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख २१ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १ लाख १२ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले आहे. विशेष म्हणजे, या योजनेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वलस्थानी होता. सध्या ९ व्या क्रमांकावर असून शिक्षण विभाग अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

पहिली ते दहावीपर्यंत मराठी तसेच सेमी इंग्रजीच्या वर्गासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेने प्रश्नमंजूषा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा व्हॅाटॲपद्वारे प्रश्न पाठवून ते सोडून घेतले जातात. विशेष म्हणजे, योग्य की अयोग्य यासंदर्भातही वेळीच उत्तर मिळते. अभ्यासक्रम सोप्या पद्धतीचा असल्यामुळे विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. यासाठी मुख्यकार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी विशेष प्रयत्न केले असून डायट तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळातही विद्यार्थी काही प्रमाणात का, होईना अभ्यासक्रमासोबत जुडून आहे.

कोट

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटू नये यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन मिळत असून, शिक्षणाधिकाऱ्यांसह विषय तज्ज्ञ, साधनव्यक्ती, समावेशित शिक्षकतज्ज्ञ तसेच शिक्षकसुद्धा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच अधिकाधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.

-धनंजय चाफले

प्रचार्य डायट, चंद्रपूर

बाॅक्स

मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम

स्वाध्याय योजनेच्या १९ व्या आठवड्यामध्ये मराठी, विज्ञान आणि उर्दू या विषयांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे,दुर्गम असलेल्या जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.

अशी आहे आकडेवारी

३,२६,५४७

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी

२,२१८९१

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

११२३१३

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी