शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एक बादली पाण्यासाठी जागावी लागते रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:48 IST

खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.

ठळक मुद्देखापरी (ध.) येथे पाणीटंचाई : प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमुर : खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.चिमूर शहरापासून दहा किमी अंतरावरील खापरी (धर्मु) गावात पाणी पुरवठा करण्यासाठी २० वर्षांपूर्वी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली होती. तेव्हापासुन या योजनेतून खापरी येथील नागरिकांना पाणी मिळू लागले. मात्र बदलते वातावरण व उष्णतेने नळ योजनेचे सर्व स्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे नळाद्वारे चार दिवसाआड दोन बादली पाणी मिळणेही कठीण झाले. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन सार्वजनिक विहिरी आहेत. सोबतच दोन बोरवेल असूनही पाणी मिळत नाही. विहिरीचे झ़रे कोरडे पडल्याने पाणी आटले. त्यामुळे नागरिकांना बादलीभर पाण्यासाठी रात्री जागावी लागते. दिवस उजाळला की पाण्याची चिंता सुरू होते. एक हंडा भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत. काही महिला शेतातील विहिरीवर पायपिट करून हंडाभर पाणी आणून दिवस काढत आहेत. बैलबंडी असणारे कुटुंब ड्रम भरुन पाणी आणून दैनंदिन गरज भागवित आहेत. खापरी गावात पाण्याचा गंभीर प्रश्न असतानाही प्रशासनाने याकडे अद्याप लक्ष दिले नाही, असा आरोप गावकरी करीत आहेत.गावातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेवून सरपंच प्रकाश मेश्राम यांनी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकाऱ्यांच निवेदनाद्वारे लक्ष दिले होते. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावी, अशी मागणी केली होती. मात्र अजुनही गावात उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी शिवारात भटकंती करावी लागत आहे. मागील वर्षीदेखील पाणी टंचाई निर्माण झाली होती. या गावात दरवर्षी हीच समस्या कायम असताना प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना केल्यास समस्या दूर होवू शकते. पण, लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने समस्या कायम आहे.आधी पाणी, मग दुसरे कामगावात भीषण पाणी टंचाई असल्याने गावातील महिला व पुरुष प्रथम पाण्यालाच सर्वप्रथम महत्त्व देत आहेत. बादलीभर पाणी मिळाल्यानंतरच दुसरे काम करतात, अशी परिस्थिती गावात निर्माण झाली. पाण्यासाठी विहिरी व दोन बोरवेल असूनही निराशा वाट्याला येत आहे. २० वर्षांपूर्वी उभारलेल्या नळ योजनेसाठी कायमस्वरूपी जलस्त्रोत निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तहसीलदार, सवर्ग विकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले. मात्र प्रशासनाने गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.- प्रकाश मेश्राम,सरपंच, ग्रामपंचायत खापरी