शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

एक बादली पाण्यासाठी जागावी लागते रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:48 IST

खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.

ठळक मुद्देखापरी (ध.) येथे पाणीटंचाई : प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमुर : खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.चिमूर शहरापासून दहा किमी अंतरावरील खापरी (धर्मु) गावात पाणी पुरवठा करण्यासाठी २० वर्षांपूर्वी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली होती. तेव्हापासुन या योजनेतून खापरी येथील नागरिकांना पाणी मिळू लागले. मात्र बदलते वातावरण व उष्णतेने नळ योजनेचे सर्व स्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे नळाद्वारे चार दिवसाआड दोन बादली पाणी मिळणेही कठीण झाले. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन सार्वजनिक विहिरी आहेत. सोबतच दोन बोरवेल असूनही पाणी मिळत नाही. विहिरीचे झ़रे कोरडे पडल्याने पाणी आटले. त्यामुळे नागरिकांना बादलीभर पाण्यासाठी रात्री जागावी लागते. दिवस उजाळला की पाण्याची चिंता सुरू होते. एक हंडा भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत. काही महिला शेतातील विहिरीवर पायपिट करून हंडाभर पाणी आणून दिवस काढत आहेत. बैलबंडी असणारे कुटुंब ड्रम भरुन पाणी आणून दैनंदिन गरज भागवित आहेत. खापरी गावात पाण्याचा गंभीर प्रश्न असतानाही प्रशासनाने याकडे अद्याप लक्ष दिले नाही, असा आरोप गावकरी करीत आहेत.गावातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेवून सरपंच प्रकाश मेश्राम यांनी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकाऱ्यांच निवेदनाद्वारे लक्ष दिले होते. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावी, अशी मागणी केली होती. मात्र अजुनही गावात उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी शिवारात भटकंती करावी लागत आहे. मागील वर्षीदेखील पाणी टंचाई निर्माण झाली होती. या गावात दरवर्षी हीच समस्या कायम असताना प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना केल्यास समस्या दूर होवू शकते. पण, लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने समस्या कायम आहे.आधी पाणी, मग दुसरे कामगावात भीषण पाणी टंचाई असल्याने गावातील महिला व पुरुष प्रथम पाण्यालाच सर्वप्रथम महत्त्व देत आहेत. बादलीभर पाणी मिळाल्यानंतरच दुसरे काम करतात, अशी परिस्थिती गावात निर्माण झाली. पाण्यासाठी विहिरी व दोन बोरवेल असूनही निराशा वाट्याला येत आहे. २० वर्षांपूर्वी उभारलेल्या नळ योजनेसाठी कायमस्वरूपी जलस्त्रोत निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तहसीलदार, सवर्ग विकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले. मात्र प्रशासनाने गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.- प्रकाश मेश्राम,सरपंच, ग्रामपंचायत खापरी