शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

दुसऱ्या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन काळातही कोळसा खाण कामगारांनी गजबजलेला हा परिसर आजही निर्मनुष्य दिसत होता.

ठळक मुद्देएरवी गजबजलेल्या खाण परिसरात स्मशान शांतता : संपामुळे वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खासगीकरणाच्या विरोधात कोळसा कामगारांनी पुकारलेला संप शुक्रवारी दुसºया दिवशीही सुरू होता. जिल्ह्यातील सर्व खाणीत कोणताही कामगार कामावर रूजू झाला नाही. त्यामुळे दुसºया दिवशीही जिल्ह्यातील कोणत्याही कोळसा खाणीत उत्पादन होऊ शकले नाही. यामुळे वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन काळातही कोळसा खाण कामगारांनी गजबजलेला हा परिसर आजही निर्मनुष्य दिसत होता. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाºया सास्ती, गोवरी, पोवणी, बल्लारपूर, गोवरी डीप, साखरी या ओपनकास्ट आणि बल्लारपूर ३ व ४ पिट व सास्ती या दोन भूमिगत अशा सर्व आठ खाणीतील कोळसा व माती उत्खनन पूर्णपणे बंद होते. येथील दोन खाणीत खासगी कंत्राटदारामार्फत सुरू असलेले माती उत्खननही बंद होते. कोळशाची रेल्वे व खासगी ट्रकद्वारे होणारी पूर्ण वाहतूक ठप्प होती. आजही कामगार घरूनच निघाले नसल्याने केवळ अधिकारी तेवढे कामावर होते. काम बंद झाल्याने वेकोलिचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकारच्या कोळसा उद्योगात कमर्शियल मायनिंगच्या निर्णयावर सरकारने विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, असे सर्वच कामगारांचे म्हणणे आहे. पाचही कामगार संघटनांनी हा विषय कामगारापर्यंत अत्यंत प्रखरपणे पोहोचविल्याने व त्याचा यथायोग्य प्रचार झाल्याने कामगार स्वयंस्फुर्तपणे या संपात सहभागी झाले, हे विशेष. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सर्व संघटनांना पत्र लिहून कामगारांच्या या अस्तित्वाच्या लढाईला आपला पाठिंबा घोषित केला आहे.कमर्शियल मायनिंगच्या माध्यमातून रोजगार मिळेल. सरकारला महसुलाद्वारे फायदा मिळेल. हा दावा पूर्णत: खोटा व दिशाभूल करणारा आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने ५२ कॅपटीव्ह माईन्स खासगी उद्योगांना देऊन हा प्रयोग केला आहे. पण त्यातील केवळ चार माईन्स सुरू झाल्या. त्यातून लोकांना रोजगार तर मिळाला नाहीच उलट तेथील कामगारांचे शोषण झाले. या कमर्शियल कोळसा खाणीमुळे काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होऊन कामगार व जनतेचे शोषण होणार आहे. या कमर्शियल मायनिंगमुळे देशाचा विकास होणार नाही.-नंदकिशोर म्हस्के, केंद्रीय अध्यक्ष,संयुक्त खदान मजदूर संघ(आयटक), नागपूर.अत्यावश्यक सेवाही बंदचशुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा विद्युत, पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा यामध्ये काम करणारे कर्मचारी कामावर आले नाहीत. प्रथम, द्वितीय व तृतीय रात्र पाळीतही कामगार संघटनांचे नेते पदाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. कुठल्याही स्थितीत संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा इंटक, आयटक, बीएमएस, एचएमएस व सिटू या पाचही कामगार संघटनांचा निर्धार आहे.

टॅग्स :Strikeसंप