शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू

By admin | Updated: June 11, 2016 01:12 IST

जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवजात बाळ दगावल्याची घटना ३० मे रोजी घडली असून,

कारवाईची मागणी : पित्याचा पत्रकार परिषदेत आरोपचंद्रपूर : जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवजात बाळ दगावल्याची घटना ३० मे रोजी घडली असून, याप्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप यादव कोटरंगे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.संदीप कोटरंगे यांनी पत्नी रिना कोटरंगे हिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात २९ मे रोजी सकाळी भरती केले. सकाळी १०.५० वाजता त्यांना पुत्ररत्न झाले. ३० ला लसीकरण करण्यात आल्यानंतर त्याला ताप आला. रात्रीच्या सुमारास अचानक ताप वाढल्यानंतर संदीप कोटरंगे यांच्या पत्नी रिना आणि सासू या दोघींनी स्टॉपरूमकडे धाव घेऊन दरवाजा ठोठावला. परंतु, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा परिचारिकांना आवाज दिला. मात्र, त्यांनी बाळाची प्रकृती तपासली नाही किंवा साधी चौकशीही केली नाही. यातच काही वेळात बाळाची हालचाल थांबली. यानंतर बाळाला घेऊन रिना या नर्सकडे गेल्या असता, उपस्थित परिचारिकांनी त्यांना खालच्या माळ्यावर पाठविले. परंतु, तोपर्यंत बाळ दगावले होता. परिचारिका आणि डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणे आणि उपचार करणे आवश्यक असताना जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून नेहमीच निष्काळजी केली जात असल्याचा आरोपही संदीप कोटरंगे यांनी यावेळी केला. याप्रकरणाची तक्रार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुनघाटे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी चार दिवसात चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनपर्यंत याप्रकरणात कुणावरही कारवाई न झाल्याने परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे समर्थन येथे केला जात असल्याचा आरोप संदीप कोटरंगे, रत्नमाला कावळे, नंदा कोटरंगे, राहुल बालमवार, विवेक धोटे, प्रकाश नागरकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)