शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

नवीन दराचे खत उपलब्ध नाही, जुन्याच दराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

चंद्रपूर जिल्हा हा शेतीप्रधान आहे. खरीप हंगामाला अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बियाणे, ...

चंद्रपूर जिल्हा हा शेतीप्रधान आहे. खरीप हंगामाला अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बियाणे, खत, आदींची जुळवाजुळव सुरू झाली आहे. शेतातील तण काढण्यात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, खतांच्या किमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ६०० रुपयांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊनमुळे पूर्वीच शेतकरी संकटात असल्याने पुन्हा भाववाढ झाल्याने या भाववाढीचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी नवीन किमतीनुसार खतविक्री केली जात असून, शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे. याची सतत्या पडताळण्यासाठी ‘लोकमत’ने काही कृषी केंद्रात खताच्या किमतीबाबत विचारपूस केली. यावेळी नवे खत आले नसल्याने जुन्याच दरात खताची विक्री सुरू असल्याचे समोर आले.

कोट

जुन्याच दराने खताची विक्री करण्याचे निर्देश कृषी व्यावसायिकांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी खते किंवा बियाणाची खरेदी करताना परवानाधारक कृषी व्यावसायिकांकडूनच करावी, तसेच त्याच्याकडून पक्के बिल घ्यावे. नव्या दराने खत विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर.

----

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटीला खताची खरेदी करीत असतो. मात्र, यंदा आर्थिक अडचणीमुळे खताची खरेदी केली नाही. त्यामुळे खताची विक्री कोणत्या भावाने सुरू आहे. याबाबत माहिती नाही.

-भूषण जुनघरी, शेतकरी.

-------

खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे ऐकले आहे. पूर्वीच लॉकडाऊनने आर्थिक संकट आहे. त्यातच भाववाढ झाली तर शेती करायची कशी, मालाला भाव नसल्याने शेती परवडेनाशी झाली आहे.

- विकास पिंपळकर, शेतकरी,

------

नव्या दाराने खताची विक्री केल्यास कारवाई

केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर नव्या दराने खताची विक्री करण्यात आल्यास त्या कृषी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या दराने विक्री होत असल्यास त्याची तक्रार कृषी कार्यालयाकडे करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केले आहे.

------

खरीप लागवडीचे क्षेत्र

४,१७,०००