शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नवदाम्पत्य विवाह नोंदणीत निरुत्साही

By admin | Updated: May 11, 2014 00:10 IST

लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. आयुष्यात एकदाच येणारा हा सुंदर क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, असे प्रत्येकाला वाटते.

राजकुमार चुनारकर - खडसंगी

लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. आयुष्यात एकदाच येणारा हा सुंदर क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, असे प्रत्येकाला वाटते. पण लग्न घरात वाढती महागाई, हॉलचे भाडे, अन्नधान्याची नासाडी, याकडे लक्ष देत युवकांचा नोंदणी विवाहाकडे ट्रेन्ड वाढायला पाहिजे. मात्र संस्कृतीच्या नावावर याकडे दुर्लक्ष करुन विवाह आयोजित केले जात आहेत. विवाहासाठी अतिउत्साही असणारा नववर व परिवारतील लोक मात्र विवाहाच्या नोंदणीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. विवाहाच्या दोन पद्धती प्रचलित आहेत. त्यामध्ये नियोजित विवाह, प्रेमविवाह, नियोजित विवाहामध्ये वर व वधू यांच्या कुटुंबाच्या सहमतीने विवाह करण्यात येतो तर प्रेमविवाहामध्ये परिवाराचा विरोध असल्याने मुलगा व मुलगी पळून जावून मंदिरात किंवा कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह करतात. नोंदणी विवाह करण्याचा सर्वात मोठा आणि प्राथमिक फायदा म्हणजे नोंदणीमुळे पतीपत्नीच्या नात्यावर कायद्याची मोहर बसते. कोणत्याही नवदाम्पत्यासाठी ही कायदेशिर बाब पूर्ण होणे गरजेचे आहे. नोंदणी विवाहासाठी फक्त लग्नाच्या तारखेच्या महिनाभर आधी अर्ज करावा लागतो. हा अर्ज दुय्यम निबंधक यांच्याकडे द्यावा लागतो. याकरिता मात्र नोंदणी विवाहासाठी साक्षीदार, वयाचा दाखला, रहिवाशी पुरावा, पासपोर्ट फोटो द्यावा लागतो. नोंदणी झाल्यावर साक्षीदाराचा उपस्थितीत हा विवाह लावला जातो. त्यानंतर आठ ते पंधरा दिवसात दाखला देण्यात येतो. प्रत्येकाच्या लग्न करण्याच्या धार्मिक पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी लग्नाची प्रत्यक्ष नोंदणी होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. राज्यात विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार नोंदणी केली जाते. नोंदणी करण्याबद्दल अपुरी माहिती, काही गैरसमज अशी काही कारणेही नोंदणी न करण्यामागे असतात. वैदिक विवाह झाल्यानंतर किंवा थेट नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची सोय यात असते. मात्र वर्षभरानंतरही नोंदणी केल्यास मात्र दंड आकारला जातो. नवदाम्पत्यांनी विवाह नोंदणी ऐच्छिक मानू नये. ती महिलांच्या सामाजिक स्थितीशी निगडीत आहे. कारण एखाद्या पतीकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध कायद्याने प्रत्येक महिलेला दिलेला आधार आहे. विशेषत: ग्रामीण भागात कर्ज काढून मुलीचे लग्न बर्‍याच परिवाराकडून करुन दिले जाते. अशावेळी नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास खर्च वाचतो. पण ग्रामीण भागात स्त्रियांना आजही विवाह नोंदणीची माहिती नाही. हुंडा दिला नाही म्हणून स्त्रियांवर सासरकडून अत्याचार केला जातो. यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही जास्त आहे. अशावेळी मात्र विवाहाची नोंदणी झाली असेल तर घटस्फोटाचेही मिळण्यास मदत होते. सोबतच मुलाचा ताबा कोणाकडे असावा, हे सुद्धा या कायद्यान्वये नमूद केले आहे. कारण अशावेळी नोंदणी विवाहाचा दाखलाच उपयोगी पडतो. शासनाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिल्याने अशा जोडप्यांना नोंदणी विवाह हाच अंतीम पर्याय ठरणार आहे.